शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

देश लुटणाऱ्यांना शिक्षा द्या: मोदी

By admin | Published: February 13, 2017 12:35 AM

ज्यांनी देशाला लुटले आहे आणि सर्वसामान्यांना बरबाद केले आहे अशांना या निवडणुकीत शिक्षा देण्याचा संकल्प करा.

श्रीनगर / पिथौरागढ : ज्यांनी देशाला लुटले आहे आणि सर्वसामान्यांना बरबाद केले आहे अशांना या निवडणुकीत शिक्षा देण्याचा संकल्प करा. त्यामुळे भविष्यात कोणी तुमच्या आयुष्याशी खेळणार नाही, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विरोधकांवर हल्ला केला.सैन्यबहुल भागात जनतेला त्यांनी भावनिक आवाहन केले आणि ‘वन रँक, वन पेन्शन’चा मुद्दा काँग्रेसने ४० वर्षे प्रलंबित ठेवल्याबद्दल आणि सर्जिकल स्ट्राईकवर शंका घेऊन सैनिकांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली. मोदी म्हणाले की, उत्तराखंडच्या निर्मितीला विरोध करणारा काँग्रेस पक्ष आज सपासोबत जाऊन बसला आहे. या राज्यात १५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला आहे. या सरकारला हटवून भाजपचे सरकार आणण्याचे आवाहन त्यांनी केले. मोदी म्हणाले की, या मुख्यमंत्र्यांनी उत्तराखंडच्या विरोधात काय नाही केले? ते मागच्या दाराने सत्तेत आले आहेत. अन्यथा जनतेने त्यांना मुख्यमंत्री होऊ दिले नसते. कलंकित उमेदवारांना तिकिटे का दिली?कलंकित नेत्यांना आम्ही पक्षातून बाहेर काढले. पण, मोदी यांनी त्यांना भाजपत घेऊन उमेदवारी का दिली असा सवाल काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उपस्थित केला. असा ‘कचरा’ पक्षात का घेतला? असा सवाल त्यांनी केला. उत्तराखंडात रविवारी राहुल यांनी ७५ किमीचा रोड शो केला. ते म्हणाले की, कलंकित नेत्यांना भाजपात स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे भ्रष्टाचारावर बोलण्याचा मोदी यांना आता अधिकार नाही. मोदी म्हणतात की, ते भ्रष्टाचाराविरुद्ध लढत आहेत. मग या कलंकित नेत्यांना भाजपाने उमेदवारी का दिली? असा सवाल त्यांनी केला. दरम्यान, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याबाबत रेनकोटचे जे शब्द मोदी यांनी वापरले होते, त्यावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, असे शब्द मोदी यांच्या कार्यालयाच्या मोठेपणाला शोभणारे नाहीत. दरम्यान, या रोड शोमध्ये काही जणांनी भाजपाचे झेंडे फडकावून ‘मोदी, मोदी’ अशा घोषणा दिल्या.