शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'८० हजार पोलीस काय करत आहेत, अमृतपाल प्रकरणात यंत्रणा अपयशी'; हायकोर्टाने पंजाब पोलिसांना फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 14:01 IST

पंजाबमध्ये गेल्या तीन दिवसापासून इंटरनेट बंद करण्यात आले आहे.

पंजाबमध्ये गेल्या तीन दिवसापासून इंटरनेट बंद करण्यात आले आहे. खलिस्तानची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी अमृतपाल सिंग या अटक करण्यासाठी पोलिसांनी राज्यभरात तपास सुरू केला असून अद्याप अटक झालेली नाही. आता उच्च न्यायालयाने यावरुन पंजाबच्या यंत्रणांना फटकारले आहे. मंगळवारी याप्रकरणी पंजाब पोलिसांवर प्रश्न उपस्थित करत उच्च न्यायालयाने अमृतपाल सिंग याच्या अटकेवरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खंडपीठाने म्हटले की, पंजाबचे ८०,००० पोलीस काय करत आहेत? अमृतपाल सिंगचे गायब होणे हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे, असं न्यायालयाने म्हटले आहे. 

 

पत्नी-मुलाचा कारनामा! 'मी जिवंत आहे...' म्हणत 'तो' पुरावा घेऊन एसपी ऑफिसमध्ये पोहचला अन्...

यावेळी पंजाब पोलिसांनी उत्तर देताना म्हटले की, अमृतपाल सिंगच्या अटकेसाठी घेराव घालण्यात येत आहे. सीमांवर नाकेबंदी करण्यात आली आहे. अमृतपाल सिंग याच्या अनेक समर्थकांना अटक करण्यात आली आहे. यातील ५ जणांवर रासुका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय अमृतपालवर एनएसएही लावण्यात आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात जर अनेक साथीदारांना अटक झाली असेल तर अमृतपालला का पकडले नाही, असा सवालही न्यायालयाने केला. उत्तरात पंजाब पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगितले. अशा परिस्थितीत आपण काळजीपूर्वक कारवाई करत आहोत असं म्हटले आहे . याप्रकरणी आम्ही वेळीच कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले. अमृतपाल सिंग सलग तीन दिवस पोलिसांना चकमा देत आहे. तो वेश धारण करून नेपाळ किंवा पाकिस्तानला पळून जाऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

'देशाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई झाली-भगवंत मान

दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, आम्ही कोणालाही अशांतता निर्माण करू देणार नाही. काही घटक आहेत जे पाकिस्तानच्या भडकावून द्वेषपूर्ण वक्तव्ये देत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्याअंतर्गत देशाविरोधात बोलणाऱ्या सर्वांना पकडण्यात आले आहे. पंजाबची शांतता आणि देशाची प्रगती ही आमची प्राथमिकता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याप्रकरणी मान सरकारचे कौतुकही केले. 

टॅग्स :PunjabपंजाबPoliceपोलिसHigh Courtउच्च न्यायालय