शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Navjot Singh Sidhu: 'पंजाबच्या जनतेचा AAPवर विश्वास, त्यांनी चांगला निर्णय घेतला'- नवज्योतसिंग सिद्धू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 16:17 IST

Navjot Singh Sidhu: 'मतदार कधीच चुकीचे नसतात, त्यांना राज्यात बदल हवा होता आणि त्यांनी तो घडवला. मतदाराचा आवाज, हा देवाचा आवाज असतो.'

चंदीगड: काल पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. पाचपैकी चार राज्यात भाजपने बहुमत मिळवले, तर पंजाबमध्ये (Punjab Assemble Election Result) काँग्रेसला (Congress) धक्का देत आप(AAP)सत्तेत आली. आपने मिळवलेल्या अभुतपूर्व यशामुळे सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. या निकालानंतर आज काँग्रेसचे पंजाब प्रमुख नवज्योतसिंग (Navjot Singh Sidhu ) आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

'AAPवर लोकांचा विश्वास'माध्यमांशी बोलताना सिद्धू म्हणाले की, ''हे बदलाचे राजकारण आहे, नवीन सरकार आणण्याच्या या निर्णयाबद्दल मी पंजाबच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. मतदार कधीच चुकीचे नसतात, त्यांना राज्यात बदल हवा होता आणि त्यांनी तो घडवला. यापूर्वी आम्हाला सहावेळा निवडून दिले होते. मतदाराचा आवाज, हा देवाचा आवाज असतो. या निवडणुकात लोकांचा आपवर विश्वास होता आणि त्यांनी तो दाखवून दिला. आपण जनतेचा कौल नम्रतेने स्विकारायला हवा," असे सिद्धू म्हणाले.

'माझ्यासाठी देश प्रथम'''पंजाबची उन्नती हे आमच्यासाठी सर्वात आधी आहे. हेच आमचे ध्येय आहे आणि त्यापासून आम्ही कधीच भरकटलो नाहीत. जेव्हा एखादा योगी धर्मयुद्धावर असतो, तेव्हा तो सर्व संबंध तोडून, बंधनांपासून मुक्त होऊन राष्ट्राची सेवा करतो. त्यावेळेस त्याला मृत्यूची भीती नसते, माझ्याबाबत तसेच आहे. मी नेहमी राष्ट्राला प्रथम स्थान दिले आहे. निकाल आमच्या बाजूने नव्हता, पण मी इथे पंजाबमध्ये आहे आणि इथेच राहणार.'' 

'चिंता नाही, चिंतन करण्याची गरज'ते पुढे म्हणाले, "माझे येथील जनतेशी असलेले नाते मर्यादित नाही, ते आध्यात्मिक आणि मनाचे मनाशी आहे. जनतेशी माझे नाते केवळ निवडणुकीतील विजय-पराजयापुरते नाही. मला पंजाबमधील लोकांमध्ये देव दिसतो आणि त्यांच्या कल्याणातच माझे कल्याण आहे. आता जे व्हायचे होते, ते होऊ गेले. आता चिंता करण्याची नाही, चिंतन करण्याची गरज आहे. त्यामुळे मी पंजाबच्या जनतेचे आभार मानतो आणि आपला शुभेच्छा देतो.''

आपकडून सिद्धूंचा पराभवपंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी अमृतसर पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांना आम आदमी पार्टी (AAP) च्या जीवनज्योत कौर यांच्याकडून 6,000 मतांच्या फरकाने पराभव स्विकारावा लागला. सिद्धूंना 32,929 मते मिळाली, तर जीवनज्योत कौर यांना 39,520 मते मिळाली.

आपचा मोठा विजयAAP ने पंजाब विधानसभा निवडणुकीत 92 जागांवर विजय मिळवून 117 सदस्यांच्या विधानसभेत तीन चतुर्थांश बहुमतासह राज्यात आपले सरकार स्थापन केले. काँग्रेसला 18 जागा मिळाल्या तर भारतीय जनता पक्षाला दोन जागा मिळाल्या. शिरोमणी अकाली दलाला (एसएडी) तीन जागा मिळाल्या, तर बहुजन समाज पक्षाला केवळ एक जागा जिंकता आली. 

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसAAPआपBhagwant Mannभगवंत मान