शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

गरज पडल्यास अधिकाऱ्यांना इस्रायललाही पाठवेन; केजरीवालांच्या बैठकीनंतर मान यांचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 4:51 PM

मान म्हणाले, "गरज पडल्यास मी माझ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इस्त्रायललाही पाठवीन. यावर कुणाला कशामुळे आक्षेप असावा.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकतीच पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. ही बैठक म्हणजे, एक प्रशिक्षण कार्यक्रम असल्याचेही सांगण्यात आले होते. यासंदर्भात विरोधकांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर 'रिमोट कंट्रोल'ने चालत असल्याचा आरोप केला होता. यावर भगवंत मान यांनी आता उत्तर दिले आहे. 

मान म्हणाले, "गरज पडल्यास मी माझ्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी गुजरात, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि इस्त्रायललाही पाठवीन. यावर कुणाला कशामुळे आक्षेप असावा. दिल्ली सरकार शिक्षण, वीज आणि आरोग्य विषयात तज्ज्ञ आहेत. मग मी अधिकाऱ्यांना का पाठवू नये?" याच आठवड्याच्या सुरुवातीला अरविंद केजरीवाल यांनी पंजाबच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मात्र, मान या बैठकीत उपस्थित नव्हते. 

या बैठकीनंतर, विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने केजरीवालांवर 'रिमोट कंट्रोल'चा आरोप करत, मोठा वाद निर्माण केला. एवढेच नाही, तर माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हेदेखील या बैठकीवर टीका करणाऱ्यांमध्ये सामील होते. त्यांनीही ट्विट करत या बैठकीवर टीका केली होती. यावर मान म्हणाले, कुणी आक्षेप घेतला, कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणजे सर्व आहेत का?

'चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी ते कोठेही जाऊ शकतात' -मान म्हणाले, "विरोधी पक्ष कोणता आहे? कुठे आहे? केवळ विरोधासाठी विरोध करू नका. मीच अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासाठी दिल्लीला पाठवले होते. ते चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कोठेही जाऊ शकतात. मीच याची परवानगी दिली होती. यात चूक काय?" 

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपcongressकाँग्रेस