शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

"सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:33 IST

Punjab Election 2022 Charanjit Singh Channi And Bhagwant Mann : पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी यांनी सणसणीत  टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - पंजाब विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. येत्या 20 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने जोरदार तयारी केली आहे. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी सणसणीत  टोला लगावला आहे.

पंजाब निवडणुकांसाठी अमृतसरमध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत बोलताना भगवंत मान यांनी काँग्रेसचा उल्लेख सर्कस असा केला होता. "काँग्रेस पक्ष आता पंजाबमध्ये एक सर्कस बनला आहे. चन्नीसाहेबांचा ते लढत असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव होणार आहे. आप त्यांचा पराभव करेल. ते जर आमदारच नसतील, तर ते कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत" असं म्हटलं होतं. त्याला टीकेला आता चरणजीत सिंग चन्नी यांनी एका कार्यक्रमात बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. "ही जर आमची सर्कस असेल, तर तिथे माकडाची जागा रिकामी आहे. त्यासाठी त्यांचं स्वागत आहे. त्यांना दाखल व्हायचं असेल तरी ते होऊ शकतात" असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

काही दिवसांपूर्वी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान (Bhagwant Mann) यांच्यावर रोड शो दरम्यान हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अमृतसर येथील अटारी भागातून भगवंत मान यांचा ताफा जात असतानाच लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्यावेळी अज्ञाताकडून त्यांच्यावर दगड भिरकावण्यात आला. यात ते जखमी झाले होते. कारचा सनरूफ उघडून भगवंत मान हे उभे राहिले होते व लोकांना अभिवादन करत ते पुढे चालले होते. लोक स्वागत करण्यासाठी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत होते. त्याचवेळी गर्दीतून अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर दगड फेकण्यात आला. त्यात ते जखमी झाले. या घटनेनंतर उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार झाल्यानंतर त्यांनी पुन्हा प्रचार सुरू केला होता.

दरम्यान, पंजाबमधील सर्व जागांसाठी 20 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर निकाल 10 मार्चला लागणार आहेत. आम आदमी पार्टीकडून भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले आहे. आम आदमी पार्टीने लोकांची मते मागवून त्यानुसार हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची घोषणा आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. दरम्यान, भगवंत मान हे पंजाबमधील संगरूर येथून दोनवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत.  

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२AAPआपcongressकाँग्रेसPoliticsराजकारण