शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
4
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
5
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
6
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
7
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
8
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
9
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
10
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
11
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
13
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
14
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
15
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
16
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
17
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
18
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
19
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!

सरकारी खजाना झाला कमी; पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनात विलंब, कसं निर्माण झालं संकट?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2022 3:57 PM

सप्टेंबर महिन्याचे सहा दिवस उलटून गेले असून अद्यापपर्यंत पंजाबमधील भगवंत मान सरकार कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन देऊ शकलेले नाही.

सप्टेंबर महिन्याचे सहा दिवस उलटून गेले असून अद्यापपर्यंत पंजाबमधीलभगवंत मान सरकार कर्मचाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन देऊ शकलेले नाही. त्यामुळे राज्य सरकार निधीअभावी अडचणीत सापडल्याची चर्चा पंजाबमध्ये सुरू झाली आहे. साधारणपणे सरकारी कर्मचाऱ्यांना मागील महिन्याचा पगार एक तारखेलाच दिला जातो. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की जीएसटी भरपाई प्रणाली संपल्यानंतर हे संकट वाढले आहे. राज्य सरकारला जीएसटी भरपाई अंतर्गत १६ हजार कोटी रुपये मिळाले होते. यावर्षी पंजाब सरकारला चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी जीएसटी मिळाला आहे. त्यानंतर ही व्यवस्था ३० जूनपासून संपली.

मार्च महिन्यात आम आदमी पक्षाचे सरकार सत्तेत आले आणि तेव्हापासून पगार वेळेवर मिळत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ याच महिन्यात वेतन देण्यास विलंब झाला आहे. पंजाब सरकारचे दरवर्षी ३१,१७१ कोटी रुपये पगारावर खर्च होतात. यामध्ये दरमहा २,५९७ कोटी रुपयांचा समावेश आहे. व्याज मिळावं यासाठी सरकार १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करत आहे, असी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

का झालाय विलंब?एका अधिकाऱ्याने सांगितले की, “ही सरकारी तिजोरीच्या फायद्याची बाब आहे. कर्मचारी आम्हाला पाठिंबा देतील आणि एक आठवडा प्रतीक्षा करण्यास सक्षम असतील असं आम्हाला वाटतं. ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या कर्मचाऱ्यांना आम्ही वेतन दिलं आहे. इतरांनाही लवकरच वेतन दिलं जाईल.”

जेव्हा जेव्हा सरकारकडे पैशांची कमतरता असते तेव्हा ग्रुप सी आणि ग्रुप डी च्या कर्मचाऱ्यांना पहिला पगार दिला जातो. त्यानंतर ए आणि बी ग्रुपच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो. पॉवर सबसिडीमुळे पंजाब सरकारच्या तिजोरीवरही बोजा वाढत आहे. यावर्षी सुमारे २० हजार कोटी रुपयांचा सबसिडीचा बोजा पंजाब सरकारवर पडणार आहे. यामध्ये १८ हजार कोटी रुपयांच्या मोफत वीजेचा समावेश आहे, जी शेतकऱ्यांना दिली जात आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

अनेक खर्च वाढलेयाशिवाय, आप सरकारने प्रत्येक घरात ३०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय गतवर्षी डिसेंबरपर्यंतची थकबाकी माफ केल्यामुळे १ हजार २९८ कोटी रुपयांचा बोजा पडला आहे. पगार आणि वीज सबसिडी व्यतिरिक्त, पंजाब सरकारकडे व्याजाची रक्कम म्हणून २०,१२२ कोटी रुपये, पेन्शन म्हणून १५,१४५ कोटी रुपये द्यावे लागतात. याशिवाय पंजाबला २७,९२७ कोटी रुपये अॅडव्हान्स्ड आणि लोनचेही द्यावे लागणार आहेत. पंजाब सरकारला इतर खर्चासाठी २० हजार कोटी रुपयांची गरज आहे.

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान