शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
4
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
5
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
6
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
7
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
8
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
9
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
10
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
11
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
12
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
13
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
14
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
15
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
16
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
17
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
18
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
19
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
20
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 

पंजाबच्या राज्यपालांकडून राष्ट्रपती राजवटीची धमकी, मुख्यमंत्री मान यांचा भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 1:01 AM

मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे.

चंडीगड : राज्यपाल बनवारीलाल पुरोहित पंजाबमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत असल्याचा आरोप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शनिवारी केला. मात्र, मणिपूर आणि हरयाणामधील राज्यपाल तेथील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मौन पाळत आहेत, अशी टिप्पणीही त्यांनी केली. 

पुरोहित यांनी शुक्रवारी मान सरकारला इशारा दिला होता की, ते राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात आणि त्यांच्या पत्रांना उत्तर न दिल्यास फौजदारी कारवाईदेखील सुरू करू शकतात. मान हे त्यांना पाठविलेल्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप पुरोहित यांनी केला आहे. यामुळे त्यांच्या अधिकाराचा अवमान होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

मान यांनी असा दावा केला आहे की, त्यांना मिळालेल्या बहुतांश पत्रांना उत्तर दिले आहे. मान म्हणाले की, पंजाबच्या राज्यपालांनी त्यांना १६ पत्रे लिहिली होती. त्यांपैकी नऊ पत्रांना उत्तर देण्यात आले आहे. राज्यपालांनी पत्र लिहिण्याची घाई करू नये आणि त्वरित उत्तराची अपेक्षा करू नये, असे ते म्हणाले. 

मान म्हणाले की, त्यांचे सरकार अमली पदार्थांच्या विळख्याला तोंड देण्यासाठी सक्रिय पावले उचलत आहे. तस्करांच्या मालमत्ता जप्त करणे, छापे टाकणे अशा कारवाया केल्या जात आहेत. पण, राज्यात कायदा आणि सुव्यवस्था चांगली नसल्याचा दावा राज्यपालांनी केला आहे. 

मला राज्यपालांना विचारायचे आहे की, हरयाणाच्या राज्यपालांनी हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांना नूह येथे घडलेल्या घटना, जातीय संघर्ष आणि हिंसाचार यांबाबत नोटीस बजावली आहे का? हरयाणाच्या राज्यपालांनी त्यांना काही पत्र लिहिले आहे का? पंजाबचे राज्यपाल पंजाबमधील कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल चिंतित होते; परंतु, मणिपूरवर त्यांनी कधीही विधान केले नाही.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मान