शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

Punjab Traffic Rules: दारू पिऊन वाहन चालवल्यास रक्तदान आणि समाजसेवा; पंजाब सरकारचा अनोखा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2022 15:40 IST

Punjab Traffic Rules: पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे.

चंदीगड:पंजाबमधील आम आदमी पक्षाच्या सरकारने राज्यात वाहतूक नियमांबाबत नवीन अधिसूचना जारी केली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास आता केवळ दंड भरावा लागणार नाही, तर चुकीची पुनरावृत्ती केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. यासोबतच दारू पिऊन वाहन चालवणाऱ्याचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येईल आणि त्या व्यक्तीला नजीकच्या रुग्णालयात समाजसेवा करावी लागेल किंवा एक युनिट रक्तदान करावे लागेल.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई

पंजाब सरकारने वाहतुकीच्या नियमात केलेले बदल सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. कोणी वाहतुकीचा नियम मोडला तर त्याला रिफ्रेशर कोर्स करावा लागेल, असे नोटिफिकेशनमध्ये नमूद करण्यात आले आहे. यानंतर परिवहन प्राधिकरणाकडून प्रमाणपत्रही घ्यावे लागणार आहे. एवढेच नाही तर किमान 20 शालेय विद्यार्थ्यांना दोन तास वाहतुकीचे नियम शिकवावे लागणार आहेत. याशिवाय, सामान्य शिक्षा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित केले जाईल, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. यामध्ये ओव्हरस्पीडिंग, वाहन चालवताना मोबाईल फोन वापरणे, दारू पिऊन गाडी चालवणे, ट्रिपल रायडिंग आणि सिग्लन तोडणे, यांचा समावेश आहे.

उल्लंघन केल्यास किती दंडओव्हरस्पीडिंगवर आता पंजाबमध्ये 1000 रुपये दंड आकारला जाईल. जर कोणी या नियमाचे वारंवार उल्लंघन करताना आढळले तर दंड दुप्पट केला जाईल. त्याचबरोबर दारू पिऊन गाडी चालवल्यास, गाडी चालवताना मोबाईल फोन वापरल्यास 5000 रुपये दंड आकारला जाईल. या नियमाचे दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास दंडाची रक्कम दुप्पट केली जाईल. ओव्हरलोड वाहनांवर प्रथमच 20 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुसऱ्यांदा दुप्पट दंड भरावा लागेल. याशिवाय, पहिल्यांदा सिग्लन मोडल्यास किंवा ट्रिपल रायडिंग केल्यास 1,000 रुपये दंड आकारला जाईल. पुन्हा नियमाचे उल्लंघन केल्यास दुप्पट दंड भरावा लागेल. 

पंजाबमधील वाहतुकीची स्थिती काय आहेवाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी आणि नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पंजाब सरकारने पोलिसांना ट्रॅफिक बॅरिअर्स बसवण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या पंजाबमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन सामान्य बाब झाली आहेय येथे दररोज 13 लोक रस्ते अपघातात मृत्युमुखी पडतात. 2011-2020 दरम्यान पंजाबमध्ये 56,959 हून अधिक अपघात झाले. ज्यामध्ये 46,550 लोकांचा मृत्यू झाला होता.

टॅग्स :PunjabपंजाबAAPआपBhagwant Mannभगवंत मान