शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

पाणीकरार रद्द करण्याचा पंजाबचा कायदा बेकायदा

By admin | Published: November 11, 2016 4:48 AM

हरयाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू व काश्मीर या राज्यांबरोबरच चंदीगडशी असलेल्या सतलज-यमुना जोड कालवा पाणीवाटपाचे सर्व करार संपवण्यासाठी पंजाब सरकारने

नवी दिल्ली/अमृतसर : हरयाणा, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, जम्मू व काश्मीर या राज्यांबरोबरच चंदीगडशी असलेल्या सतलज-यमुना जोड कालवा पाणीवाटपाचे सर्व करार संपवण्यासाठी पंजाब सरकारने २००४ साली मंजूर केलेला कायदा सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी रद्दबातल व घटनाबाह्य ठरवला असून, त्यामुळे पंजाब सरकारला मोठा धक्का बसला आहे. पंजाबमधील सर्व काँग्रेस आमदारांनी व खासदार कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी या निकालाच्या निषेधार्थ आपल्या पदांचे राजीनामे देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयासाठी काँग्रेसने सत्ताधारी अकाली दल-भाजप सरकारला जबाबदार धरले असून, सरकारने पंजाबची बाजू सर्वोच्च न्यायालयात नीट न मांडल्यामुळे असे घडल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केला आहे.पंजाब सरकारने केलेला कायदा २००३ सालच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाशी सुसंगत नसल्याचे स्पष्ट करीत, हा कायदा बेकायदा आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने देताच, त्याची तीव्र प्रतिक्रिया पंजाबमध्ये उमटली आहे.सतलज युमना कालव्याच्या या निकालावरुन पंजाबमध्ये जोरदार राजकारण सुरु झाले आहे. राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार असून, त्यात हाच मुद्दा कळीचा ठरणार आहे. हरयाणाला त्यांच्या वाट्याचे पाणी मिळावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब सरकारला सतलज युमना कालव्याचे उर्वरित बांधकाम करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने २००३ साली बांधकामाचे निर्देश दिल्यानंतर तत्कालिन अमरिंदर सिंग सरकारने २00४ साली शेजारी राज्यांबरोबरचे पाणीवाटपाचे करार रद्द रद्द करण्यासाठी विधानसभेत विशेष विधेयक आणले होते. ते मंजूर झाल्याने अन्य राज्यांना पाणी देणेही बंद झाले होते.हरयाणाने या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर राज्याची बाजू मांडताना पंजाब सरकारने पाणीवाटपाबाबत नवा लवाद नेमण्याची विनंती न्यायालयाला केली होती. पंजाबमधून वेगळे झाल्यामुळे हरयाणाचा पाण्यावरील अधिकार आपोआप रद्द झाला आहे, असेही पंजाबने म्हटले होते. मात्र न्या. अनिल दवे यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींच्या पीठाने पंजाबकडून उपस्थित करण्यात आलेले सर्व प्रश्न व आक्षेप अमान्य केले. पंजाब अन्य राज्यांच्या पाणीवाटपाबाबतचा करार एकतर्फी रद्द करू शकत नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)