शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

गोपनीयता हा मूलभूत हक्क आहे की नाही?, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 10:13 PM

गोपनीयता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की नाही, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज चर्चा करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - गोपनीयता हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे की नाही, या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात आज चर्चा करण्यात आली आहे. आधार कार्डला विविध योजनांसाठी सक्तीचं करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणा-या याचिका सर्वोच्च न्यायालयात आधीच दाखल झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखाली काल 5 सदस्यीय खंडपीठाकडे सुनावणी झाली होती. त्यानंतर आज गोपनीयतेच्या मुद्द्यावर 9 जणांच्या खंडपीठाकडे पुन्हा सुनावणी झाली. मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील 9 जणांच्या खंडपीठाकडे सुरू असलेल्या सुनावणीला अ‍ॅड. गोपाल सुब्रह्मण्यम यांनी सुरुवात करून दिली. आयुष्य आणि स्वातंत्र्याचा अधिकाराचं पहिल्यापासूनच मूलभूत हक्कांमध्ये समावेश असल्याचंही सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सांगितले. मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वाखालील 9 जणांच्या या खंडपीठात जे. चेलामेश्वर, एस. ए. बोबडे, आर. के. अग्रवाल, आर. एफ. नरिमन, ए. एम. सप्रे, डी. वाय. चंद्रचुड, संजय किशन कौल आणि एस. ए. नजीर यांचा समावेश आहे. या प्रकरणावर सुनावणी सुरूच राहणार असून, लवकरच निर्णय येण्याची शक्यता आहे. 

आणखी वाचा(मूलभूत अधिकारांप्रमाणे कर्तव्यपालनातही आग्रही राहा)
समाजात अनेक नागरिक आपल्या मूलभूत अधिकारांसाठी आग्रही राहतात. परंतु सर्वजण आपले कर्तव्य पार पाडण्यात आग्रही भूमिका घेत नाहीत. त्यामुळे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाऊन इतरांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे मूलभूत अधिकारांप्रमाणे कर्तव्यपालनातही नागरिकांनी आग्रही भूमिका घेण्याचे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास शिरपूरकर यांनी केले.

भूमाफिया पीडित जनआंदोलनाच्या वतीने हिंदी मोरभवन सभागृहात आयोजित सभेला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार उमेश चौबे, माजी सहायक पोलीस आयुक्त रमेश मेहता, जनआंदोलनाचे अध्यक्ष दिलीप नरवडिया, अ‍ॅड. सुभाष काळबांडे, अ‍ॅड. राजेश नायक, रवी गाडगे पाटील उपस्थित होते. विकास शिरपूरकर म्हणाले, कोणताही गुन्हा पैसा, बाई आणि जमिनीच्या वादातून घडतो. रिकाम्या जागेचा ताबा घेण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत असून, त्याबाबतचा कायदा करण्याची गरज आहे. पुढील व्यक्ती आपल्यावर आक्रमण करीत नाही तोपर्यंत गप्प बसण्याची सर्वांना सवय आहे.