शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

भोपाळ दहशतवादी चकमकीवर विरोधकांचे प्रश्नचिन्ह

By admin | Published: October 31, 2016 2:55 PM

काँग्रेसने फरार सिमी दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 31 - भोपाळमधील तुरुंगातून फरार झाल्यानंतर मारल्या गेलेल्या सिमीच्या आठ दहशतवाद्यांविरोधात झालेल्या चकमकीवरून वाद रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसने या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. तर आपनेही या चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  
काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंग यांनी  हे सर्व प्रकरण म्हणजे एक षडयंत्र असून, त्याची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला पाहिजे असे म्हटले आहे. "हे दहशतवादी तुरुंगातून पळाले की त्यांना कुठल्या षडयंत्रांतर्गत पळवण्यात आले हा तपासाचा विषय असला पाहिजे," असे दिग्विजय सिंग यांनी म्हटले आहे. 
 
(VIDEO - तुरुंगातून पळालेले सिमीचे आठ दहशतवादी चकमकीत ठार)
 
तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनीही या चकमकीवर शंका घेतली आहे. "या चकमकीमध्ये सर्व फरार दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामुळे आपल्याला या घटनेबाबत आता कुठलीही माहिती मिळू शकत नाही. म्हणूनच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी," असे कमलनाथ म्हणाले. तसेच  आपनेही या चकमकीवर शंका घेतली आहे.  दहशतवादी मारले गेले हे चांगले झाले. मात्र आठ दहशतवाद्यांचे एकत्र पलायन करणे आणि काही वेळातच त्यांचे एकत्रितपणे एन्काऊंटर होणे, शंकास्पद आहे. सरकारकडे 'व्यापम' फॉर्म्युला होता म्हणायचं," असे ट्विट आपच्या महिला आमदार अलका लांबा यांनी केले आहे.