शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'सर्व बालगृहांची त्वरित तपासणी करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 05:22 IST

भारतरत्न मदर तेरेसा यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील सर्व बालगृहांची तपासणी व पाहणी करण्याचे आदेश महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दिले आहेत.

नवी दिल्ली : भारतरत्न मदर तेरेसा यांनी सुरू केलेल्या धर्मादाय संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या देशभरातील सर्व बालगृहांची तपासणी व पाहणी करण्याचे आदेश महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दिले आहेत.झारखंडमधील मिशनरीज आॅफ चॅरिटिजच्या बालगृहातून लहान मुलांची विक्री करण्यात आल्याच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आदेश दिले आहे. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मनेका गांधी यांनी म्हटले आहे की, झारखंडमधील बालगृहातून मुलांची जी विक्री करण्यात आली, त्यामुळे देशाच्या सर्व राज्यांतील या संस्थेच्या बालगृहांची पाहणी व तपासणी होणे गरजेचे आहे, तसेच देशातील सर्वच बालगृहांची नोंदणी करण्यात यावी आणि सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीशी त्यांना संलग्न करण्यात यावे.जुवेनाइल जस्टिस कायद्यान्वये सर्व बालगृहे सेंट्रल अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीशी संलग्न असणे बंधनकारक आहे. गेल्या आठ महिन्यांत सुमारे २३00 बालगृहांना संलग्नता मिळाली असून, अद्याप ४ हजार बालगृहांबाबत निर्णय व्हायचा आहे. देशातील बालगृहांमध्ये सुमारे २ लाख ३३ हजार मुले आहेत. अर्थात या बालगृहांतील सर्व मुलांना दत्तक योजनेत आणण्यात आलेले नाही.>पैसे घेतले, पण मूल नाही दिलेझारखंडमध्ये मिशनरीज आॅफ चॅरिटीजने मुलांना विकल्याचा आरोप झाला होता. संस्थेच्या कर्मचाºयांनी आपल्याकडून पैसे घेतले, पण प्रत्यक्षात मूल दिले नाही, अशी तक्रार एका जोडप्याने केल्याने हा प्रकार उघडकीस आला. या आरोपांमुळे ही संस्था भलतीच अडचणीत आली असून, काही भाजपा नेत्यांनी तर मदर तेरेसा यांना देण्यात आलेला भारतरत्न हा किताब केंद्र सरकारने काढून घ्यावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी