शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

"राजीव गांधी दोनदा नापास झाले, तरीही काँग्रेसनं त्यांना पंतप्रधान बनवलं’’, मणिशंकर अय्यर यांचा स्वपक्षालाच टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:26 IST

Mani Shankar Aiyer News: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे.

वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या एका विधानामुळे आणखी एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. यावेळी मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी किंवा कुठल्या विरोधी पक्षातील नेत्याला नाही तर स्वत:च्या पक्षातीलच माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्या टीकेचं लक्ष्य केलं आहे. मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे काँग्रेसची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे.

इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर देशाचं नेतृत्व करणाऱ्या राजीव गांधींच्या पात्रतेबाबत मणिशंकर अय्यर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच अशा व्यक्तीला देशाचं पंतप्रधान बनवलं गेलं, हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, असा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मणिशंकर अय्यर म्हणाले की, राजीव गांधी एक विमान वैमानिक होते. मात्र ते दोन वेळा नापास झाले होते. केंब्रिज विद्यापीठात नापास होणं तसं कठीण आहे. कारण विद्यापीठ विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करतं. तरीही राजीव गांधी नापास झाले. त्यानंतर ते इंपिरियल कॉलेज लंडन येथे शिक्षणासाठी गेले. तिथेही ते अपयशी ठरले. असा व्यक्तीला भारताचं पंतप्रधान कसं काय बनवलं गेलं, असा प्रश्न मणिशंकर अय्यर यांनी उपस्थित केला.

मणिशंकर अय्यर यांनी केलेल्या विधानांवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे खासदार कुंवर दानिश अली यांनी सांगितले की, राजीव गांधी यांना देशात आयटी क्रांती आणि आधुनिकरणासाठी ओळखलं जातं. त्यांनी पंचायत राजची सुरुवाती केली होती.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर भाजपा नेते अमित मालवीय यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. मणिशंकर अय्यर यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ शेअर करताना अमित मायवीय यांनी लिहिले की, राजीव गांधी हे शैक्षणिकदृष्ट्या संघर्ष करत होते. केंब्रिज आणि इंपिरियल कॉलेज दोन्ही ठिकाणी ते अयशस्वी ठरले. तरीही त्यांना पंतप्रधान बनवण्यात आलं. गुपित उघड होऊ द्या, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.   

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीcongressकाँग्रेसMani Shankar Aiyarमणिशंकर अय्यर