शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

मुख्यमंत्री गुंडांना पाठिशी घालतात राधाकृष्ण विखे : कायदा- सुव्यवस्था राखण्यात अपयश

By admin | Published: October 03, 2015 12:20 AM

लोणी (अहमदनगर) : नागपूर शहरासह राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे़ गृहमंत्री तथा मुख्यमंत्री पोलीस अधिकार्‍यांना पाठिशी घालून गुंडांना संरक्षण देत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़

लोणी (अहमदनगर) : नागपूर शहरासह राज्यातील कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, सरकारच्या बोटचेप्या भूमिकेमुळे सामाजिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे़ गृहमंत्री तथा मुख्यमंत्री पोलीस अधिकार्‍यांना पाठिशी घालून गुंडांना संरक्षण देत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी केली़
लोणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विखे म्हणाले, भाजयुमोचा अध्यक्ष सुमीत ठाकूर याच्या दहशतीला कंटाळून नागपूर सोडणार्‍या प्रा़ मल्हारी म्हस्के यांना मुख्यमंत्र्यांनी भेटण्याचे व चौकशी करण्याचे औदार्यही दाखविले नाही़ नागपूरचे तत्कालीन पोलीस आयुक्त पाठक यांच्या कार्यकाळातच गुन्हेगारीने डोके वर काढले़ मुख्यमंत्र्यांनी त्याच पाठक यांना पुणे पोलीस आयुक्त पदावर नियुक्त करणे म्हणजे अकार्यक्षम अधिकार्‍यास पदोन्नती दिली आहे़ त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून, कायदा- सुव्यवस्था राखण्यात मुख्यमंत्र्यांना अपयश आल्याची टीका विखे यांनी केली आहे़
जलयुक्तचा बोजवारा
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या बंधार्‍यांपैकी अनेक बंधारे वाहून गेले आहेत़ राज्यातील दुष्काळ हटला नाही. मात्र, या योजनेचा बोजवारा उडाला आहे़ सरकार दुष्काळ हटविण्यासाठी काम करीत नाही तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्कही माफ करीत नाही़ मात्र, करवाढीतून उभा केलेला ४० कोटी रुपयांचा निधी सरकारने जाहिरातींसाठी राखीव ठेवल्याचे सांगत विखे यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली़