शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

राहुल गांधींनी केला काँग्रेसचा पराभव मान्य

By admin | Published: May 19, 2016 12:31 PM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी विधानसभा निवडणुकीत झालेला पक्षाचा पराभव मान्य केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 19 - पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुडुचेरी या पाचही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस चमकदार कामगिरी करु शकलेली नाही. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाचा पराभव मान्य केला आहे. 'निवडणुकीत मेहनत घेणा-या प्रत्येक काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या नेता आणि कार्यकर्त्याचे मी आभार मानतो. आपण नम्रपणे लोकांनी दिलेला निर्णय मान्य करत जिंकलेल्या पक्षाचं अभिनंदन करतो. लोकांचा विश्वास जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत अजून कष्ट घेऊ', असं राहुल गांधी बोलले आहेत. 
 
( इथे पाहा २०१६ विधानसभा निवडणूक निकाल) 
 
महत्वाचं म्हणजे आसामसमध्ये काँग्रेसला सर्वात मोठा फटका बसला असून गेल्या 15 वर्षांपासून असलेले एकहाती वर्चस्व संपुष्टात आले आहे. आसाममध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष सत्तेत येणार असल्याचं चित्र आहे.  126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजपाने 75 जागांवर आघाडी मिळवली आहे.
 
भाजपाने आघाडी घेतली असताना काँग्रेसला मात्र फक्त 29 जागांवरच आघाडी मिळवता आली आहे. ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटला 13 जागांवर आघाडी मिळाली आहे.