शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

थेट भरती हा दलित, आदिवासी, ओबीसींच्या हक्कांवर हल्लाच, राहुल गांधींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 07:02 IST

राहुल गांधी यांनी उबेर कॅबमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला, यात ते ड्रायव्हर सुनील उपाध्याय यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेताना दिसतात.

नवी दिल्ली: दलित, ओबीसी, आदिवासी यांचे हक्क हिरावून केंद्र सरकारच्या सेवेत लोकांची मोदी सरकार थेट भरती करत आहे. बहुजनांच्या राखीव जागा भाजपने हिसकावून घेतल्या आहेत, असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी केला. तर केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), ओबीसी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी असलेल्या पदांवर रा. स्व. संघाच्या लोकांची थेट भरती केली, अशी टीका काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. 

नोकऱ्यांमध्ये थेट भरती हा दलित, ओबीसी, आदिवासींच्या हक्कांवर थेट हल्ला आहे. भाजप रामराज्याचे नाव घेत हे गैरप्रकार करत आहे, अशी टीका राहुल गांधी यावेळी केली. तसेच, राहुल गांधी यांनी उबेर कॅबमध्ये प्रवास करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला, यात ते ड्रायव्हर सुनील उपाध्याय यांच्याकडून त्यांना येणाऱ्या अडचणींची माहिती घेताना दिसतात. कमी उत्पन्न आणि वाढती महागाई ही भारतातील कामगारांची प्रमुख समस्या आहे. ते केवळ जगत असून, कुटुंबाच्या भविष्यासाठी कोणतीही बचत किंवा कोणताही आधार त्यांच्याकडे नाही, असे राहुल गांधी म्हणाले. 

केंद्रीय मंत्री चिराग पासवान म्हणाले... केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये यूपीएससीद्वारे होणारी थेट भरतीची पद्धत अयोग्य आहे. आम्ही त्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार आहोत असे लोक जनशक्त्ती पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सेवेतील ४५ पदे थेट भरतीद्वारे भरण्याची यूपीएससीने अधिसूचना जारी केली आहे. त्याविरोधात आवाज उठविणारा लोक जनशक्ती हा एनडीएतील पहिला घटक पक्ष आहे. सरकारी पदे भरताना राखीव जागांचे तत्व पाळण्यात आलेच पाहिजे असेही पासवान यांनी म्हटले आहे.

कंत्राटी भरतीत ९१ टक्क्यांनी वाढ' मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सरकारी खात्यांमधील पदे भरण्यापेक्षा भाजपच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत सार्वजनिक उपक्रमांतील आपल्या हिश्शाची विक्री केली. याद्वारे सरकारी सेवांतील ५.१ लाख पदे रद्द केली. या कालावधीत कंत्राटी तत्त्वावर होणाऱ्या भरतीत ९१ टक्क्यांनी वाढ झाली. २०२२-२३ या कालावधीत सरकारी नोकऱ्यांतील एससी, एसटी, ओबीसी यांच्या पदांची संख्या १ लाख ३० हजारांनी कमी झाली. केंद्र सरकारच्या काही खात्यांमध्ये विशिष्ट पदांवर खासगी क्षेत्रासह अन्य क्षेत्रांतील तज्ज्ञांची थेट भरती करण्याचे धोरण तत्कालीन काँग्रेस सरकारने अंमलात आणले होते. मात्र मोदी सरकारने दलित, आदिवासी, मागासवर्गीय यांच्या हक्कांवर गदा आणून थेट भरती करण्याचे धोरण अवलंबिले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस