शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

राहुल गांधींची मोठी घोषणा! येत्या २४ तासांत काँग्रेस ५ निवडणूक आश्वासने पूर्ण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 14:24 IST

कर्नाटकात सिद्धरामय्या आणि डीके शिकुमार यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

कर्नाटकातील नवीन काँग्रेस सरकारच्या शपथविधी समारंभात सिद्धरामय्या यांनी शनिवारी कर्नाटकचे २४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. येथील कांतीरवा स्टेडियमवर हा सोहळा पार पडला. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सिद्धरामय्या यांना पदाची शपथ दिली. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्री म्हणून ही दुसरी टर्म आहे. यापूर्वी ते २०१३ ते २०१८ या काळात या पदावर होते. कार्यक्रमस्थळी पोहोचल्यावर सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांनी हात जोडून गर्दीचे स्वागत केले. नंतर राहुल गांधीही व्यासपीठावर गेले. शपथविधी सोहळ्याला सुमारे एक लाख लोक उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर मंचावर आलेल्या राहुल गांधींनी लोकांना संबोधित करताना सांगितले की, कर्नाटक सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक येत्या दोन तासांत होणार असून, त्यांनी दिलेल्या पाच आश्वासनांची घोषणा करणार आहे. 

राहुल गांधी यांनी व्यासपीठावर येऊन काँग्रेसच्या निमंत्रणावर आलेल्या सर्व विरोधी नेत्यांची नावे घेतली आणि त्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, मी कर्नाटकातील जनतेचे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून आभार मानतो. तुम्ही काँग्रेस पक्षाला पूर्ण पाठिंबा दिला.

राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासन वाचली आणि ती पूर्ण करण्याची घोषणा केली. कर्नाटकच्या नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक एक-दोन तासांत होईल, असंही ते म्हणाले. यातील पाच आश्वासनावर कायदे बनतील, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीपूर्वी काँग्रेसने ५ हमीभावाचे आश्वासन दिले होते. या आश्वासनांमध्ये सर्व घरांना २०० युनिट मोफत वीज (गृह ज्योती), प्रत्येक घरातील महिला प्रमुखाला (गृहलक्ष्मी) २००० रुपये मासिक मदत, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबातील प्रत्येक सदस्याला १० किलो मोफत अन्न यांचा समावेश आहे. बेरोजगार पदवीधर तरुणांना दरमहा रु. ३,००० आणि बेरोजगार पदविकाधारकांना (दोन्ही १८-२५ वयोगटातील) (युवा निधी) दोन वर्षांसाठी रु. १,५०० आणि सार्वजनिक वाहतूक बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवास.

राहुल गांधींनी दिलेल्या पाच आश्वासनांची पूर्तताही केली जात असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, गेल्या ५ वर्षात तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला हे तुम्हाला आणि आम्हाला माहीत आहे. या विजयामागे एकच कारण आहे आणि ते म्हणजे काँग्रेस कर्नाटकातील गरीब, मागास आणि दलितांच्या पाठीशी उभी राहिली. ते म्हणाले की, द्वेष मिटला आणि प्रेमाचा विजय झाला, असे आम्ही यात्रेदरम्यान सांगितले होते. कर्नाटकाने द्वेषाच्या बाजारात लाखो प्रेमाची दुकाने उघडली आहेत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूक