शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

मानहानी प्रकरणात राहुल गांधींना दिलासा, MP-MLA कोर्टाने दिला जामीन; काय आहे प्रकरण? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:20 PM

Rahul Gandhi : राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रा' थांबवून या प्रकरणी न्यायलयात हजर राहण्यासाठी पोहोचले होते.

Rahul Gandhi (Marathi News) सुलतानपूर : मानहानी प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी मंगळवारी (20 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार-आमदार न्यायालयानेराहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. राहुल गांधी हे 'भारत जोडो न्याय यात्रा' थांबवून या प्रकरणी न्यायलयात हजर राहण्यासाठी पोहोचले होते. हे संपूर्ण प्रकरण 2018 सालचे आहे, जे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संबंधित आहे. 

राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत अमित शाह यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजपा नेते विजय मिश्रा यांनी 4 ऑगस्ट 2018 रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. दरम्यान, 8 मे 2018 रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान बंगळुरू येथे झालेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री यांच्यावर खुनाचा आरोप केला होता, असा आरोप विजय मिश्रा यांनी केला होता.

राहुल गांधी न्यायालयात हजर राहण्यापूर्वी भाजपा नेते विजय मिश्रा म्हणाले की, राहुल गांधींनी अमित शाहांना 'किलर' म्हटले होते. अनेक अपशब्द वापरले होते, आम्ही त्यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. तसेच, भाजपा हा देशातील सर्वात मोठा पक्ष आहे. अशा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षाला खुनी संबोधले जाईल, हे अन्यायकारक आहे. यामुळे आम्हाला खूप दुःख झाले, त्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर दबाव आणला आणि आम्ही तक्रार दाखल केली, असे विजय मिश्रा यांनी सांगितले होते.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सांगितले होते की, राहुल गांधी यांना 20 फेब्रुवारी रोजी सुलतानपूर येथील उत्तर प्रदेश जिल्हा न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. हे प्रकरण भाजपा नेत्याने 4 ऑगस्ट 2018 रोजी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याशी संबंधित आहे. तसेच,  भारत जोडो न्याय यात्रा 20 फेब्रुवारीला सकाळी थांबेल आणि दुपारी 2 वाजता फुरसातगंज, अमेठी येथून पुन्हा कार्यक्रम सुरू होईल.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालयUttar Pradeshउत्तर प्रदेशcongressकाँग्रेसAmit Shahअमित शाह