शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

"तेलंगणात मिळालेलं यश राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेमुळेच; आम्ही ७०हून जास्त जागा जिंकू"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2023 09:58 IST

Telangana Assembly Election Result 2023: काँग्रेसचे तेलंगणा निरीक्षक माणिकराव ठाकरेंचा मोठा दावा

Telangana Vidhan Sabha Election Result 2023: तेलंगणातील मतमोजणी सुरू होताच, या राज्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक माणिकराव ठाकरे यांनी मोठा दावा केला आहे. तेलंगणामध्येकाँग्रेस ७०हून अधिक जागा जिंकेल. एक्झिट पोलनेही तेच सांगितले आहे. तेलंगणात काँग्रेसला अनुकूल वातावरण दिसून आले आहे, याचे श्रेय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला जाते. त्यांच्या या यात्रेचे फलित म्हणून आम्ही नक्कीच ११९ पैकी ७० पेक्षा जास्त जागा जिंकू असा विश्वास माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा निवडणूक निकालांच्या LIVE UPDATES साठी क्लिक करा!

माणिकराव ठाकरे एएनआयला म्हणाले, "आमच्या पक्षप्रमुख प्रियांका गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकांना आमच्या धोरणांबद्दल नीट समजावून सांगितले. राहुल गांधींच्या भारत जोडो दौऱ्याचा चांगला परिणाम झाला. केसीआर तेलंगणात एखाद्या बादशाह किंवा सम्राटासारखे वागले. काँग्रेसने तेलंगणाला राज्याचा दर्जा दिला होता. राज्यातील प्रत्येकाची तीच इच्छा होती आणि ती इच्छा काँग्रेसने पूर्ण केली. तेलंगणाला वेगळ्या राज्याच्या दर्जा दिल्यावर तेथील लोकांची आणि राज्यातील प्रगती होईल असे वाटले होते. पण तसे झाले नाही. याउलट राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे राज्यातील लोकांना आशेचा किरण दिसला," अशा शब्दांत त्यांनी राहुल यांच्या यात्रेबाबत विश्वास व्यक्त केला.

त्यांनी सीएम केसीआर यांच्यावर टीका केली. काँग्रेसने सर्वसामान्य जनतेत जाऊन काम केले आणि म्हणूनच लोकांचे लक्ष काँग्रेसकडे वळले. "केसीआर यांनी जाहिरातींवर अमाप पैसा खर्च केला. त्यांनी त्यांच्या फार्महाऊसमधून सरकार चालवले. कोणालाही रोजगार दिला नाही. पण आम्ही सर्वांशी बसून आणि बोलून पक्षाला पुढे नेले. सर्व काम विचारपूर्वक केले. चांगले वातावरण निर्माण झाले आणि लोकांनी काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. त्यामुळे आता तेलंगणात आम्ही विजयी होऊ", असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, तेलंगणातील विधानसभेच्या १९९ जागांसाठी आज सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. मतमोजणीच्या प्रक्रियेत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांसह 109 पक्षांच्या 2,290 उमेदवारांचे भवितव्य उघड होईल. त्यानंतर दुपारपर्यंत निकालाचे स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

२०१८ मध्ये, भारत राष्ट्र समिती (BRS) म्हणजेच तेव्हाची तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ने 119 पैकी 88 जागा जिंकल्या होत्या. तेव्हा त्यांना ४७ टक्के मते होती. तर काँग्रेस १९ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

टॅग्स :telangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३TelanganaतेलंगणाK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावRahul Gandhiराहुल गांधीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेस