शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  
2
भारत-चीनमधील सीमावाद संपणार! दोन्ही देशांमध्ये LAC वर गस्तीबाबत झाला महत्त्वाचा करार
3
उद्धव ठाकरे दोन आमदारांचे तिकीट कापणार? पक्षफुटीवेळी राहिले होते सोबत; 'मातोश्री' गाठली
4
Elon Musk यांनी आणलाय Dream Job! घर बसल्या दर तासाला मिळतील ₹5000, करावं लागेल फक्त एवढं काम
5
कल्याण पूर्वेत महायुतीचा वाद विकोपाला; महेश गायकवाड निवडणूक लढण्याच्या तयारीत
6
करवा चौथसाठी पती घरी उशिरा आल्याने वाद, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल, पतीनेही संपवलं जीवन
7
Hero ची 'शुभ मुहूर्त' ऑफर, स्कूटर खरेदीवर मिळतील 15000 रुपयांचे बेनिफिट्स!
8
माय-लेकीच्या जोडीची कमाल! ५ हजारांत सुरू केली कंपनी; आज महिन्याला लाखोंची कमाई
9
Jio Vs Vi: पाहा जिओ आणि व्हीआयचा ६६६ रुपयांचा प्लॅन; कोणता घेण्यात तुमचा जास्त फायदा?
10
"काल रात्री फोनवरून चर्चा झाली, आता..."; मविआचं काय ठरलं? वडेट्टीवारांनी गोंधळ संपवला
11
श्वेता शिंदेने साजरी केली करवा चौथ, पती आहे प्रसिद्ध हिंदी अभिनेता, तुम्ही पाहिलंत का?
12
माँटी इंग्लंडमध्ये, गोल्डी कॅनडात, लखा पोर्तुगालमध्ये... लॉरेन्स बिश्नोईचे साथीदार कोणत्या देशात लपलेत?
13
"सलमान खानला मारण्यासाठी गार्डसोबत मैत्री..."; बिश्नोई गँगच्या शूटरचा मोठा खुलासा
14
Astro Tips: फक्त २ लवंगा करतील तुमच्या अडचणी दूर; सोमवारी न चुकता करा 'हा' उपाय!
15
रत्नागिरीकरांना बदल हवाय, विद्यमान आमदार नको' उदय सामंतांबाबत भाजप नेत्याचा दावा
16
"उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, आम्ही तुमच्यासोबत"; यशोमती ठाकूर यांचे मोठं विधान
17
संविधानातून 'धर्मनिरपेक्ष' आणि 'समाजवादी' शब्द काढले जाणार? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
18
प्यार तूने क्या किया! करवाचौथला घरी नव्हता नवरा; बायकोने बॉयफ्रेंडसोबत केलं लग्न
19
"नव्या जोडप्यांनी 16-16 मुलं जन्माला घालावीत, कारण..."; CM चंद्रबाबूंनंतर, आता स्टॅलिन यांचंही अजब आवाहन
20
Gold Silver Price Today : सोन्याचे दर गगनाला भिडले; चांदी एकाच दिवसात ४८८४ रुपयांनी महागली

"काँग्रेसची न्याय यात्राही दिशाभूल करण्यासाठीच; गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 3:06 PM

केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत.

उत्तर प्रदेश सरकारचे उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते केशव प्रसाद मौर्य यांनी काँग्रेसच्या भारत न्याय यात्रेवर प्रतिक्रिया दिली आहे. केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. "काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गॅरेंटीच्या गाडीसमोर राहुल गांधींच्या प्रेमाच्या खोट्या दुकानावर ना माझा विश्वास होता ना त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेवर! काँग्रेसची न्याय यात्राही जनतेची दिशाभूल करण्यासाठीच आहे, गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" असं केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.  काँग्रेसने बुधवारी पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारी ते 20 मार्च या कालावधीत ‘भारत न्याय यात्रा’ आयोजित करण्याची घोषणा केली. 

भारत न्याय यात्रेचा हा प्रवास मणिपूरपासून सुरू होऊन मुंबईपर्यंत जाईल आणि यादरम्यान 14 राज्ये आणि 85 जिल्ह्यांमध्ये सहा हजार किलोमीटरहून अधिक अंतर पार केलं जाईल. ‘भारत न्याय यात्रा’ मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधून जाईल आणि 6,200 किलोमीटरचे अंतर पार करेल.

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. ते म्हणाले, 'भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत न्याय यात्रा' काढणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे 14 जानेवारीला इम्फाळ येथून यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील. रमेश म्हणाले की, ‘भारत न्याय यात्रे’मध्ये देशातील लोकांसाठी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय यावर भर दिला जाईल.

के.सी. वेणुगोपाल यांनी बुधवारी सांगितले, "अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने (AICC) 14 जानेवारी ते 20 मार्च दरम्यान मणिपूर ते मुंबई अशी 'भारत न्याय यात्रा' आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे." या प्रवासात देशातील महिला, तरुण आणि समाजातील लोकांशी चर्चा केली जाणार आहे. 'भारत न्याय यात्रा' बहुतांशी बसने निघणार आहे, परंतु काही ठिकाणी पायी पदयात्राही होणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी