शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' नियोजित वेळेपूर्वी संपणार? कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2024 10:17 AM

Bharat Jodo Nyay Yatra : ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे.

नवी दिल्ली : देशात एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी अनेक जागांवर आपले उमेदवारही जाहीर केले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस सुद्धा राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू आहे. ही यात्रा मिझोराम येथून सुरू झाली असून ती मुंबईत संपणार आहे.

14 जानेवारीला सुरू झालेली 'भारत जोडो न्याय यात्रा' 20 मार्चला मुंबईत संपणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता याआधीच ही यात्रा संपणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'भारत जोडो न्याय यात्रे'चा वेग वाढवण्यात आला आहे. पूर्वी एका दिवसात 70 किलोमीटर प्रवास करण्याची योजना होती. मात्र, आता हा प्रवास दररोज 100 किलोमीटर वेगाने होत आहे. यासह, उत्तर प्रदेशातील यात्रेचा प्रवास आता 11 दिवसांऐवजी 6 ते 7 दिवसात काँग्रेस पूर्ण करणार आहे. यानुसार, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 'भारत जोडो न्याय यात्रा' येत्या 10 मार्च रोजी संपुष्टात येऊ शकतो.

पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडच्या राजकीय घडामोडींमुळे काँग्रेसची चिंता वाढली आहे. 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान अनेक बड्या नेत्यांनी पक्ष सोडला आहे. तसेच, अनेक मित्रपक्षही इंडिया आघाडीतून बाहेर पडले आहेत. नितीश कुमार एनडीएमध्ये सामील झाले आहेत. आरएलडीही एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर, इतर अनेक पक्षही काँग्रेसकडे बोट दाखवत आहेत. या सगळ्याला तोंड देण्यासाठी राहुल गांधींना ही यात्रा वेळेपूर्वी संपवायची आहे.

जागावाटपाबाबत होतेय विलंब!यासोबतच इंडिया आघाडीतील जागावाटपाच्या विलंबामुळेही अनेक पक्ष चिंतेत आहेत. या दिरंगाईमागे काँग्रेस हे प्रमुख कारण असल्याचे अनेक आघाडीच्या पक्षांच्या नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाने जागावाटपासाठी एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या अनेक पक्षांसोबत बैठकाही झाल्या मात्र अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. हा निर्णय राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना घ्यायचा आहे. मात्र यासाठी राहुल गांधी यांनी दिल्लीत उपस्थित राहणेही आवश्यक आहे. त्यामुळेच पक्षाला ही 'भारत जोडो न्याय यात्रा' लवकर संपवायची आहे. 

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकcongressकाँग्रेस