शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

'दुर्दैवी', राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला, काँग्रेसने भाजपवर साधला निशाणा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 15:28 IST

Rahul Gandhi Convoy Stopped: राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर गेले, यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचा ताफा पोलिसांनी अडवला.

Rahul Gandhi Manipur Visit: मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज दोन दिवसीय दौऱ्यासाठी मणिपूरमध्ये दाखल झाले आहेत. यादरम्यान ते पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहे. पण, पीडित कुटुंबियांना भेटण्यासाठी निघालेल राहुल गांधींचा ताफा मणिपूर पोलिसांनी अडवला आहे. यावरुन काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. 

हिंसाचारग्रस्त भागात परिस्थिती खराब असल्यामुळे पोलिसांनी राहुल गांधींच्या ताफ्याला रोखले. इम्फाळला पोहोचल्यानंतर राहुल गांधी चुराचंदपूरला रवाना झाले होते, मात्र पोलिसांनी त्यांचा ताफा विष्णुपूरजवळ अडवला. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसने याला दुर्दैवी म्हटले असून मोदी सरकार राहुल गांधींना रोखत असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "मोदी सरकार राहुल गांधींना मदत शिबिरांना भेट देण्यापासून आणि मणिपूरमधील लोकांशी संवाद साधण्यापासून रोखत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. राहुल गांधींचा मणिपूर दौरा भारत जोडो यात्रेच्या भावनेशी सुसंगत आहे. पंतप्रधान शांत किंवा निष्क्रिय राहणे निवडू शकतात, परंतु मणिपुरी समाजातील सर्व घटकांचे म्हणणे ऐकून त्यांना दिलासा देण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न का थांबवताय?'' असा सवालही त्यांनी केला.

मणिपूरला संघर्ष नाही तर शांतता हवी - मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींचा ताफा रोखल्याबद्दल भाजपवर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी ट्विट केले की, "राहुल गांधींच्या ताफ्याला पोलिसांनी विष्णुपूरजवळ रोखले. ते मदत छावण्यांमध्ये पीडितांना भेटण्यासाठी आणि हिंसाचारग्रस्त राज्यात मदत देण्यासाठी तेथे जात होते. पीएम मोदींनी मणिपूरबाबत मौन तोडण्याची तसदी घेतली नाही. त्यांनी राज्याला वाऱ्यावर सोडले. आता त्यांचे विध्वंसक डबल इंजिन सरकार राहुल गांधींना अडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. मणिपूरला संघर्ष नाही तर शांतता हवी आहे."

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसManipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपा