शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

राहुल गांधींना 'ती' टीका भोवली; मोदी सरकारऐवजी काँग्रेसचं जाळ्यात फसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 19:46 IST

मात्र मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी हे विसरले की हे संपूर्ण प्रकरण डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळातलं आहे.

नवी दिल्ली - महिला अधिकाऱ्यांना स्थायी पोस्टिंग देण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करुन नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. मात्र अपुऱ्या माहितीच्या आधारे मोदी सरकारवर टीका केल्यामुळे राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्षच अडचणीत आल्याचं दिसत आहे. राहुल गांधींच्या ट्विटमुळे तत्कालीन मनमोहन सिंग सरकारवरच निशाणा साधल्याचा टोला त्यांना सहन करावा लागत आहे. 

सुप्रीम कोर्टाने लष्करातील महिला अधिकाऱ्यांसाठी कायमची पोस्टिंग(स्थायी कमिशन) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. महिलांना कायमस्वरूपीची पोस्टिंग मिळाली पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारनं दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. महिलांना स्थायी पोस्टिंग देता येणार नाही, असा मोदी सरकारचा तर्क होता. महिलांना कायमची पोस्टिंग दिल्यास त्याचा शत्रू राष्ट्र लाभ घेऊ शकतो. तसेच पुरुषांनाही त्यांना सारखे सारखे आदेश देण्यात अडचणी येऊ शकतात, असा युक्तिवाद मोदी सरकारनं केला होता.  

यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, सरकारने सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवेळी युक्तिवाद करताना सैन्यातील महिला स्थायी पोस्टिंग करु शकत नाही, कारण ते पुरुषांसारखे कामकाज करु शकणार नाही. त्यामुळे भारतीय महिलांचा हा अपमान आहे. मी भारतीय महिलांच्या बाजूने आहे. भाजपा सरकारच्या युक्तिवादाला चुकीचं ठरवत कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो असं त्यांनी सांगितले. 

मात्र मोदी सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी हे विसरले की हे संपूर्ण प्रकरण डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळातलं आहे.    मनमोहन सिंग सरकारने ६ जुलै २०१० रोजी सुप्रीम कोर्टात दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध धाव घेतली होती. दिल्ली हायकोर्टाने सैन्यातील महिला अधिकाऱ्यांना स्थायी पोस्टिंग देण्याचे आदेश दिले होते. १२ मार्च २०१० रोजी झालेल्या सुनावणीवेळी दिल्ली हायकोर्टाने हा निर्णय दिला. सरकारने या निर्णयाचा पुर्नविचार करावा अशी मागणी सुप्रीम कोर्टात करण्यात आली होती. 

राहुल गांधींच्या या ट्विटवर हायकोर्टाचे वकील नवदीप सिंह यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, अशा प्रकरणात कोर्टाच्या निर्णयावर राजकारण होऊ नये, त्याचसोबत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात तत्कालीन सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सध्याचं सरकार तेव्हा नव्हतं. २०१० मध्ये केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीएचं सरकार होतं अशी आठवण त्यांनी राहुल गांधींना करुन दिली. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीManmohan Singhमनमोहन सिंगSupreme Courtसर्वोच्च न्यायालय