शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

यूपीएससीच्या तरुणांवर केंद्राचा दरोडा, परीक्षा न घेता थेट नियुक्तीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 11:00 IST

सरकार यूपीएससीऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) माध्यमातून अधिकाऱ्यांची भरती करून राज्यघटनेवर हल्ला करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर यूपीएससीची परीक्षा न घेता थेट ४५ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सरकारचे हे पाऊल ‘राष्ट्रविरोधी चाल’ असून यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण खुलेआमपणे हिसकावले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.सरकार यूपीएससीऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) माध्यमातून अधिकाऱ्यांची भरती करून राज्यघटनेवर हल्ला करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.उच्च पदांवर वंचितांचे प्रतिनिधित्व केले जात नाही. केंद्र सरकारचा हा प्रयत्न यूपीएससीची  तयारी करणाऱ्या हुशार तरुणांच्या हक्कांवर टाकलेला दरोडा आहे, असे ते म्हणाले.

सेबी हे ज्वलंत उदाहरणजेव्हा एखादी कॉर्पोरेट प्रतिनिधी  महत्त्वपूर्ण सरकारी पदांवर काम  करते तेव्हा काय कारनामे करते याचे सेबी हे एक ज्वलंत उदाहरण आहे. सेबीमध्ये प्रथमच खासगी क्षेत्रातील व्यक्तीला अध्यक्ष बनवण्यात आले.प्रशासकीय संरचनेला आणि सामाजिक न्यायाला धक्का देणाऱ्या या देशविरोधी पावलाचा ‘इंडिया’ आघाडी कडाडून विरोध करेल, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी