शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

यूपीएससीच्या तरुणांवर केंद्राचा दरोडा, परीक्षा न घेता थेट नियुक्तीवरून राहुल गांधींची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 8:48 AM

सरकार यूपीएससीऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) माध्यमातून अधिकाऱ्यांची भरती करून राज्यघटनेवर हल्ला करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

नवी दिल्ली : केंद्र सरकारमध्ये विविध पदांवर यूपीएससीची परीक्षा न घेता थेट ४५ तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सरकारचे हे पाऊल ‘राष्ट्रविरोधी चाल’ असून यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे आरक्षण खुलेआमपणे हिसकावले जात असल्याची टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली.सरकार यूपीएससीऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) माध्यमातून अधिकाऱ्यांची भरती करून राज्यघटनेवर हल्ला करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.उच्च पदांवर वंचितांचे प्रतिनिधित्व केले जात नाही. केंद्र सरकारचा हा प्रयत्न यूपीएससीची  तयारी करणाऱ्या हुशार तरुणांच्या हक्कांवर टाकलेला दरोडा आहे, असे ते म्हणाले.

सेबी हे ज्वलंत उदाहरणजेव्हा एखादी कॉर्पोरेट प्रतिनिधी  महत्त्वपूर्ण सरकारी पदांवर काम  करते तेव्हा काय कारनामे करते याचे सेबी हे एक ज्वलंत उदाहरण आहे. सेबीमध्ये प्रथमच खासगी क्षेत्रातील व्यक्तीला अध्यक्ष बनवण्यात आले.प्रशासकीय संरचनेला आणि सामाजिक न्यायाला धक्का देणाऱ्या या देशविरोधी पावलाचा ‘इंडिया’ आघाडी कडाडून विरोध करेल, असे राहुल गांधी म्हणाले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी