शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Rahul Gandhi : "एम्सच्या बाहेर नरक! रुग्णांना घाणीत झोपावं लागतंय", राहुल गांधींनी मोदी सरकारला घेरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 11:58 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्सला भेट दिली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेथील व्यवस्थेची विचारपूस केली.

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी रात्री दिल्लीतील एम्सला भेट दिली. रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांकडून तेथील व्यवस्थेची विचारपूस केली. त्यांनी केंद्र आणि दिल्ली सरकारवर रुग्णांप्रती असंवेदनशील असल्याचा गंभीर आरोप केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा एम्सच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

"एम्सच्या बाहेर नरक! देशभरातील गरीब रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना एम्सच्या बाहेर थंडी, घाण आणि उपासमारीत झोपायला भाग पाडलं जात आहे. त्यांच्याकडे छप्पर नाही, अन्न नाही, शौचालय नाही आणि पिण्याचे पाणी नाही" असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तसेच व्हिडिओमध्ये "मला खूप राग येत आहे. २१ व्या शतकात लोक असं खोटं बोलत आहेत. येथे लोक त्रास सहन करत आहेत आणि मरत आहेत हे पूर्णपणे निराशाजनक आहे" असं म्हटलं आहे. उपस्थित असलेल्या रुग्णांनीही राहुल गांधींना त्यांच्या समस्या सांगितल्या.

एम्सला भेट दिल्यानंतर राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर म्हटलं होतं की, "आजाराचं ओझं, कडक थंडी आणि सरकारी असंवेदनशीलता. केंद्र आणि दिल्ली दोन्ही सरकारे जनतेप्रती असलेली त्यांची जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहेत. परिस्थिती खूप वाईट आहे. हे ते लोक आहेत जे दूरदूरहून आपल्या प्रियजनांच्या आजाराचं ओझं वाहून आले आहेत आणि या गोठवणाऱ्या थंडीत फूटपाथ आणि सबवेवर झोपण्यास त्यांना भाग पाडलं जात आहे."

एका रुग्णाने राहुल गांधींना सांगितलं की, "काही बिहारहून आले आहेत तर काही उत्तर प्रदेशातून. आम्ही येथे थंडीत मरत आहोत. आम्हाला पिण्याचे पाणी आणि अन्न मिळत नाहीये. गेल्या १५ दिवसांपासून डॉक्टर आम्हाला इकडून तिकडे पाठवत आहेत. सकाळी ६ वाजता आम्हाला हॉस्पिटलमधून बाहेर काढलं जातं." यानंतर राहुल गांधी म्हणाले की, आम्ही फक्त तुम्हा सर्वांना मदत करण्यासाठी येथे आलो आहोत. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसdelhiदिल्लीAIIMS hospitalएम्स रुग्णालय