शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयावर ठाम, पक्षाला दिली एक महिन्याची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 15:17 IST

लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला असून, त्यांची समजूत काढण्यासाठी अनेक नेते प्रयत्नशील आहेत. मात्र राहुल गांधी हे अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असून, त्यांनी अंतिम निर्णय घेण्यासाठी पक्षाला एक महिन्याची मुदत दिल्याची चर्चा आहे. काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर अडलेल्या राहुल गांधी यांची समजूत काढण्यासाठी आज सकाळी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी तसेच प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी त्यांची भेट घेतली. तसेच अध्यक्षपदासाठी पक्षाला नवा पर्याय मिळत नसल्याचेही राहुल गांधी यांच्या कानावर घालण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले.  तुम्हाला पक्षात योग्य वाटतील तसे फेरबदल करा, तसेच पक्ष हवा तसा चालवा, असे सांगण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी काही प्रमाणात मवाळ भूमिका स्वीकारल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कार्यपद्धतीमधील काही अटींसह राहुल गांधी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहण्यास तयार आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे. अहमद पटेल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत झालेला काही टप्प्यांमधील बैठकीनंतर राहुल गांधी या निर्णयाप्रत पोहोचले आहेत, असा दावा सूत्रांनी केला आहे.  मंगळवारी सकाळपासून राहुल गांधीना भेटण्यासाठी प्रियंका गांधी, रणदीप सुरजेवाला, सचिन पायलट हे दाखल झाले होते. दरम्यान, मी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचे मन बनवले आहे.  तुम्ही एक महिन्याची मुदत घ्या, पण माझा पर्याय निवडा, असे राहुल गांधी यांनी आज झालेल्या बैठकीत एका ज्येष्ठ नेत्याला सांगितल्याचे वृत्त आहे. तसेच प्रियंका गांधी यांना या सर्वापासून दूर ठेवा. त्या कुठल्याही परिस्थितीत काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार नाहीत, असेही राहुल गांधी यांनी सांगितल्याचे वृत्त आहे.दरम्यान, लोकसभेमध्ये मी पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार आहे. तसेच मी कुठल्याही अन्य भूमिकेमध्येही काम करण्यास तयार आहे. पक्षाला भक्कम करण्यासाठी मी काम करत राहीन. मात्र अध्यक्षपदावर राहणार नाही, असेही राहुल गांधींनी सांगितल्याचे वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 52 जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ केला आहे. काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे आणि गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीकडे पक्षाची धुरा द्यावी, तसेच स्वत: पक्षाचे काम करत राहावे, अशी राहुल गांधी यांची योजना आहे.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण