शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
2
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
3
Team India Arrival LIVE: मुंबईकरांचे स्पिरीट! प्रचंड गर्दीतही अँम्ब्युलन्सला करून दिली वाट
4
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
5
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
6
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाला जाणार, परराष्ट्र मंत्रालयाने तारीख सांगितली
8
"गुजरातच्या बसला पार्किंगसाठी जागा देऊ, पण भारतीय संघाची 'बेस्ट' मधूनच मिरवणूक काढा"
9
Jio आणि Airtel नंतर आता Vi चे प्लॅन महागले; जाणून घ्या नवीन किमती...
10
Victory Parade : Team India च्या विमानाला असाही 'सॅल्युट'! अनोख्या घटनेने वेधले सर्वांचे लक्ष
11
टोमॅटो पुन्हा २०० पार जाण्याची शक्यता; मुंबई, देशभरातील आत्ताचे दर काय...
12
विश्वविजेत्या टीम इंडियाला भेटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली युझवेंद्र चहलची खास विचारणा, म्हणाले, ‘’हाच का तो…’’
13
राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!
14
इंडिया का राजा, रोहित शर्मा...! वानखेडेवर हिटमॅनचा जलवा; चाहत्यांचा एकच जल्लोष, Video
15
'T20 वर्ल्ड चॅम्पियन्स'च्या कुटुंबीयांना भेटले PM मोदी; BCCIकडून पंतप्रधानांना स्पेशल 'जर्सी'!
16
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक दारुण पराभवाच्या छायेत? सर्व्हे आला, आज मतदानाला सुरुवात
17
“कंपन्यांकडून लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे करा, शिंदे सरकार...”: नाना पटोले
18
धीरेंद्र शास्त्रींचा जन्मोत्सव; शुभेच्छा देण्यासाठी बागेश्वर धाममध्ये लाखो भाविकांची गर्दी
19
अंबादास दानवेंना दिलासा, उद्याच सभागृहात दिसणार, निलंबनाबाबत महत्त्वाचा निर्णय
20
सेन्सेक्स पहिल्यांदा 80,000 पार; BSE मार्केट कॅप 447.43 लाख कोटींच्या पुढे...

"राहुल गांधींना 'अभय मुद्रे'संदर्भात ज्ञान नाही; मी त्यांना..."! रामभद्राचार्य स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 4:52 PM

राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

काँग्रेस खासदार तथा लोकसभेती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै 2024) हिंदूंसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून राजकारण पेटताना दिसत आहे. या वक्तव्यासंदर्भात त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. याशिवाय, भाजपने हा मुद्दा हिंदू विरुद्ध राहुल गांधी असा बनवला आहे. तर दुसरीकडे आपण आपल्या वक्तव्यावर कायम आहोत, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

यातच आता, जगतगुरू रामभद्राचार्य यांनीही राहुल गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी संसदेत चुकीचे विधान केले आहे. हिंदू कधीही हिंसा करत नाही. भाजपने देखील कधीही हिंसा केली नाही, असे रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

"राहुल गांधींना अभय मुद्रेसंदर्भात ज्ञान नाही" -रामभद्राचार्य म्हणाले, "राहुल गांधींना अभय मुद्रेसंदर्भात ज्ञान नाही. मी सांगतो अभय मुद्रा काय असते ते. कँग्रेसने शिखांच्या हत्या केल्या. काँग्रेसने कितीतरी हिंसाचार केला आहे. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी चांगले व्यक्ती होते. ते माझेही चांगले मित्र होते. जर राहुल गांधींनी सभ्यता दाखवली, तर मी त्यांना बरेच काही समजावून सांगू शकतो."

'अयोध्योत झालेली चूक दुरुस्त करू' -उत्तर प्रदेश आणि अयोध्येत भाजपचे जे नुकसान झाले, त्यावर बोलताना राममभद्राचार्य म्हणाले, भाजपचा उत्तर प्रदेशात पराभव झाला, कारण त्यांना विरोधकांच्या खोट्या प्रचाराला काउंटर करता आले नाही. विरोधक सातत्याने संविधान आणि आरक्षणासंदर्भात खोटा प्रचार करत होते. भाजपला याचा सामना करता आला नाही. एवढेच नाही, तर अयोध्येत झालेल्या पराभवासंदर्भात बोलायचे झाल्यास, अयोध्येत जी चूक झाली, ती दुरुस्त केली जाईल," असेही रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Ayodhyaअयोध्याHinduहिंदू