शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

राहुल गांधी ब्रिटिश नागरिक की भारतीय नागरिक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 15:33 IST

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर भाजपाने प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. राहुल गांधी हे भारतीय नागरिक आहेत की ब्रिटिश नागरिक असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिम्हा राव यांनी विचारला आहे. राहुल गांधी यांनी 2014 मध्ये स्वत:ला ब्रिटिश नागरिक सांगितलं होतं असं राव यांनी सांगितले. 

जीव्हीएल नरसिम्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यात ते ब्रिटिश नागरिक होते असल्याचं सांगितलं गेलंय. उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधींकडून जी कागदपत्रे जोडण्यात आली आहेत त्यातून हे समोर आलेलं आहे. अमेठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर सुनावणीसाठी सोमवारपर्यंत वेळ दिला आहे. जीव्हीएल नरसिम्हा यांनी यावर आश्चर्य व्यक्त केला. काही अपक्ष उमेदवारांनी राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेत राहुल गांधी ब्रिटिश नागरिक असल्याचा दावा केला. यावर काँग्रेसकडून काहीच उत्तर आलं नाही. राहुल गांधी यांच्या कायदेशीर सल्लागारांनी राहुल हे भारतीय नागरिक आहेत की नाही यावर निवडणूक आयोगाकडे वेळ मागितला त्यामुळे यावर शंका उपस्थित होत आहे.

राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राहुलच्या वकीलांनी वेळ मागितल्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जाची छाननी थांबविण्यात आल्याचं भाजपाकडून आरोप होत आहे. राहुल गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर अमेठी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार ध्रुवलाल कौशल यांनी आक्षेप नोंदवला आहे. राहुल गांधी यांचे खरे नाव राऊल विंची आहे. राहुल गांधी यांच्याकडून खोटी कागदपत्रे सादर करण्यात आली असून निवडणूक आयोगाची दिशाभूल करण्यात येत आहे असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांनी केला. 

ध्रुव कौशल यांच्या वकीलांनी आरोप केला आहे की, राहुल यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रात इग्लंडच्या कंपनीचा उल्लेख केला नाही. राहुल हे ब्रिटिश नागरिक आहेत. त्यांच्या पदवीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. राहुल गांधी यांनी ज्या कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचा दावा केला आहे त्या कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलंच नाही असा दावा ध्रुव कौशल यांच्या वकीलांकडून करण्यात येत आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019