शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने सेलिब्रेशनसाठी केक मागविला; कशासाठी?
2
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
3
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
4
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
5
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
6
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
7
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
8
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
9
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
10
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
11
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
12
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
13
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
14
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
15
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
16
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
17
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
18
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
19
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
20
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...

राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 21:15 IST

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर आरोपही केले आहेत.

संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. दोन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. उद्या तिसऱ्या टप्पा पार पडणार आहे. यात राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत असल्याचे बघायला मिळत आहे. यातच आता, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. यात अनेक मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर आरोपही केले आहेत. राहुल यांनी लिहिले आहे, "माझ्या प्रिय काँग्रेस कार्यकर्त्यांनो, ही निवडणूक सामान्य निवडणूक नाही. केवळ राजकीय पक्षांमधील लढाई नाही, तर आपली लोकशाही आणि आपली राज्यघटना वाचवण्याची लढाई आहे."

आपण पक्षाचा कणा -राहुल यांनी पुढे लिहिले, "एका बाजूला काँग्रेसची प्रेम आणि न्यायाची विचारधारा आहे, तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकार, भाजप आणि आरएसएसची भीती, द्वेष आणि विभाजनाची विचारधारा आहे. या लढ्यात काँग्रेस पक्षाची सर्वात मोठी ताकद आपल्यासारखे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. आपण उग्र आणि निर्भय आहात, कारण काँग्रेसची विचारधारा आपल्या मनात, आपल्या विचारांत आणि आपल्या कृतीत आहे. आपण पक्षाचा कणा आहात आणि आपल्याशिवाय आम्ही जिंकू शकत नाही."

"आपण आतापर्यंत केलेल्या मेहनतीबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. आपल्यामुळेच आम्ही भारतातील लोकांचे ऐकून एक क्रांतिकारी जाहीरनामा तयार करू शकलो. आपण निवडणुकीतील पहिल्या दोन टप्प्यांत चांगल्या पद्धतीने संघर्ष केला आहे. आपण भाजपच्या खोट्या आणि लक्ष भरकटवणाऱ्या गोष्टींना विरोध करण्यास सक्षम आहोत आणि त्यांना उत्तर देण्यासही भाग पाडू शकतो," असेही राहुल यांनी लिहिले आहे.

आणखी एक महिना कठोर मेहनत -"आता आणखी एक महिना कठोर मेहनत करण्याची वेळ आहे. आपली गॅरंटी प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचायला हवी. प्रत्येकाने मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या आपण सर्व जन काँग्रेसचा संदेश आणि आपली गॅरंटी प्रत्येक गावात, मोहल्ला, गल्ली आणि घरा-घरापर्यंत पोहोचू. आता घरा घरापर्यंत पोहोचण्याची वेळ आली आहे. आपल्याला प्रत्येक तरुण, महिला, मजूर, शेतकरी आणि वंचित कुटुंबापर्यंत पोहोचावे लागेल. आपण भाजपची विचारधारा आणि त्यांच्या द्वेशाच्या अजेंड्यामुळे निर्माण झालेला धोका स्पष्ट करायला हवा. या लढाईत मी माझे सर्व काही देत आहे आणि मला आपल्याकडूनही हीच अपेक्षा आहे," असेही राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

शेवटी राहुल यांनी लिहिले, "मी जाणतो, जोपर्यंत काँग्रेसचा एकही कार्यकर्ता सत्याच्या बाजूने उभा आहे, तोवर भारतात द्वेषाचा विजय होऊ शकत नाही. आणि आपण एक नाही, तर कोट्यवधी आहोत. आपण सर्व मिळून लढू, जिंकू आणि देशाची स्थिती बदलू. आपले समर्थन, समर्पण आणि प्रेम यासाठी माझे प्रेम आणि आभार. जय हिंद"

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElectionनिवडणूकBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघNarendra Modiनरेंद्र मोदी