शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

राहुल गांधी यांचे स्थान पाचव्या रांगेत; पंतप्रधानांवर काँग्रेसची खरमरीत टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 5:30 AM

केंद्राने आराेप फेटाळले

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिन सोहळ्यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्याच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर आगपाखड केली आहे. या कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनाचा कोतेपणा, तसेच विरोधकांप्रति असलेला अनादर अधोरेखित होत असल्याचे काँग्रेसने नमूद केले आहे. केंद्र सरकारने मात्र काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यानिमित्त मान्यवरांसाठी केलेल्या आसन व्यवस्थेत राहुल गांधी यांना पाचव्या रांगेत बसविण्यात आले.

ऑलिम्पिक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या बाजूला राहुल यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, त्याचवेळी संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांची आसन व्यवस्था पहिल्या रांगेत करण्यात आली होती. या मुद्द्यावरून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर खरमरीत टीका केली. पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी समाजमाध्यम मंचावर यासंदर्भात टीका करताना या कृतीतून पंतप्रधानांच्या मनाचा कोतेपणा तर दिसतोच शिवाय लोकसभा निवडणुकीच्या निकालांतून त्यांनी काहीही बोध घेतला नसल्याचेही स्पष्ट होत असल्याचे म्हटले. 

  • काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनीही या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. विरोधकांप्रति पंतप्रधानांना आदर नसल्याचे यातून स्पष्ट होते.
  • विरोधी पक्षनेता हे घटनात्मक पद असून, त्यांना पंतप्रधानांइतकाच मान असतो. मात्र, हे संकेत केंद्र सरकारने पायदळी तुडविल्याचे श्रीनेत म्हणाल्या. 
  • ऑलिम्पिक हिरोंना सन्मानित करण्याचा निर्णय आधीच झाला होता आणि त्यानुसारच आसन व्यवस्था करण्यात आल्याचे सांगत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीIndependence Dayस्वातंत्र्य दिन