शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्वार्थासाठी नितीश कुमार जातीयवादी शक्तींसोबत गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 03:19 IST

भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला.

नवी दिल्ली : भाजपासोबत हातमिळवणी करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी निशाणा साधला. आपल्या स्वार्थी राजकीय हेतूसाठी नितीश कुमार हे जातीयवादी शक्तींकडे परत गेले असल्याची टीका त्यांनी केली.राहुल गांधी म्हणाले की, हे राजकारण तीन ते चार महिन्यांपासून शिजत होते, याची आपल्याला कल्पना होती. बिहारच्या ज्या आघाडीमधून जनता दल युनायटेड पक्ष बाहेर पडला आहे त्या आघाडीचा काँग्रेस पक्ष एक घटक होता. ते म्हणाले की, नितीश कुमार यांनी जातीयवादी शक्तींविरुद्धच्या लढाईत आमच्यासोबत हात मिळविला होता. पण ज्यांच्याविरुद्ध ते लढले आहेत त्यांच्यासोबतच आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी हातमिळवणी केली आहे. भारताच्या राजकारणातील हीच मोठी समस्या आहे.बिहारमधील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले की, राजकारणात लोकांच्या मनात काय चालू आहे याची कल्पना असते. मला हे माहीत होते की, नितीश कुमार अशी काहीतरी योजना आखत आहेत. मागील तीन-चार महिन्यांपासून हे राजकारण सुरू होते. लोक आपल्या स्वार्थी हेतूसाठी काहीही करू शकतात. कोणतेही तत्त्व, विश्वसनीयता राहिली नाही. सत्तेसाठी ते काहीही करू शकतात.नितीश कुमार यांचे बदलते राजकारण त्यांच्या प्रतिमेसाठी चांगले नाही, असे मत हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, याबाबत मी अधिक भाष्य करणार नाही. पण नितीश कुमार यांची सतत बदलत जाणारी भूमिका त्यांच्यासाठीच चांगली नाही.संसदेतही भाजपाला पाठिंबा - त्यागीपाटणा : संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संयुक्त जनता दल यापुढे भाजपाला पाठिंबा देईल, अशी घोषणा गुरुवारी त्या पक्षाचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी केली. बिहारमध्ये नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर याबाबत बोलताना के. सी. त्यागी म्हणाले की, काँगे्रस पक्ष भ्रष्टाचाराबाबत गंभीर नाही.काँग्रेसवर विश्वास ठेवणे ही मोठी चूक होती. मोदी सरकारमध्ये सहभागी होणार का, असा प्रश्न केला असता ते म्हणाले की, पक्षाचे नेतृत्व यावर निर्णय घेईल. ते म्हणाले की, नितीश कुमार आणि राहुल गांधी यांच्यामध्ये हा फरक आहे की, नितीश कुमार हे भ्रष्टाचाराबाबत तडजोड करत नाहीत तर राहुल गांधी याबाबत तडजोड करतात.