शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
2
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
3
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
4
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
5
घड्याळे, चष्मा, शूज, बॅग खरेदी करणे महाग होणार? 'या' वस्तूंवर लागणार १ टक्के अतिरिक्त कर
6
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
7
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?
8
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये तिसरी चकमक; एक जवान शहीद  
9
ED: सहारा प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, १५०० कोटींपेक्षा अधिकची नवी संपत्ती जप्त; प्रकरण काय?
10
पाकिस्तान रात्रभर दहशतीत! भारत कोणत्याही क्षणी घुसू शकतो; १८ लढाऊ विमाने एलओसीवर...
11
सचिन तेंडुलकर झाला ५२ वर्षांचा! मास्टर ब्लास्टरचे 'हे' ५ रेकॉर्ड तोडणे जवळपास अशक्य
12
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
13
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
14
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, यू-ट्युबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
15
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
16
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
17
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
18
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
19
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
20
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स

Rahul Gandhi: हेलिकॉप्टर, जहाज अन् तोफांनी नव्हे; तर देशातील नागरिकांमुळे देश मजबूत होतो, राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 16:42 IST

देशातील नागरिक मजबूत झाला तरच देश मजबूत होतो हे मोदी सरकारनं समजून घ्यायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे.

उत्तराखंड-

देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देश केवळ हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी मजबूत होत नाही. तर देशातील नागरिक मजबूत झाला तरच देश मजबूत होतो हे मोदी सरकारनं समजून घ्यायला हवं, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तराखंडमध्ये बोलत होते. उत्तराखंडच्या देहरादून येथे आयोजित सभेत ते बोलत होते. 

"तुम्ही असा अजिबात विचार करु नका की हिंदुस्थान मजबूत होत आहे. या गैरसमजुतीमध्ये अजिबात राहू नका. हेलिकॉप्टर, जहाज, तोफांनी देश मजबूत होत नाही. देश तेव्हाच मजबूत होतो जेव्हा देशातील नागरिक मजबूत होतो. जेव्हा देशातील जनता कुणालाही न घाबरता, कोणत्याही भीतीविना काम करू शकते. जेव्हा देशाचा आवाज कानाकोपऱ्यात सहज पोहचू शकतो, तेव्हाच देश मजबूत होतो", असं राहुल गांधी म्हणाले. 

"बांगलादेश युद्धावेळी देश मजबूत होता. आपल्या संस्था मजबूत होत्या. सैन्य आणि सरकारमध्ये जबरदस्त समन्वय होता. सरकार सैन्याचं ऐकायचं आणि सैन्य देखील सरकारचं ऐकायचं. दोघंही एकमेकांचा आदर करत होते. संवाद होता. देशाची अर्थव्यवस्था मजबूत होती. त्यामुळेच पाकिस्तानला १३ दिवसांत पराभूत करू शकलो. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही", असंही राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसUttarakhandउत्तराखंड