शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

Rahul Gandhi: 'मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक', राहुल गांधींचा पुन्हा एकदा केंद्रावर घणाघात! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 15:52 IST

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे.

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर बेरोजगारीच्या मुद्द्यावरुन निशाणा साधला आहे. मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे कारण नागरिकांच्या नोकऱ्या हिसकावून घेण्याच्या कामात मोदी सरकार व्यग्र आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. यासाठी राहुल गांधी यांनी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमीनं (सीएसआयई) प्रकाशित केलेल्या अहवालाचा संदर्भ दिला आहे. (Rahul gandhi slams modi governmnet over unemployment said centre is harmful for employment)

राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं असून यात मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. "मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे. कोणत्याही प्रकारच्या 'मित्रहीन' व्यवसायांना किंवा रोजगारा प्रोत्साहन किंवा मदत मोदी सरकार करत नाही. ज्यांच्याकडे नोकरी आहे तीही हिसकावून घेण्याचं काम केलं जात आहे. देशवासियांकडून आत्मनिर्भरतेचं ढोंग त्यांना अपेक्षित आहे. जनहितार्थ जारी", असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे. या ट्विटसोबतच राहुल यांनी सीएमआयईनं जारी केलेल्या अहवालाचं वृत्त देखील ट्विट केलं आहे.

ऑगस्ट महिन्यात औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही क्षेत्रांतून जवळपास १५ लाखांहून अधिक जणांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. याआधी राहुल गांधी यांनी महागाईच्या मुद्द्यावरुन हल्लाबोल केला होता. मोदी सरकारच्या 'जीडीपी'चा अर्थ गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत वाढ असा आहे, अशी टीका राहुल यांनी केली होती. "पंतप्रधान मोदी वारंवार सांगतायत GDP वाढतोय. अर्थमंत्रीही म्हणतायत GDP वाढतोय. ते नेमकं कोणत्या GDP बाबत बोलत आहेत ते मला नंतर कळलं. 'Gas-Deisel-Petrol' असा त्याचा अर्थ आहे. त्यांनी जीडीपीबाबत गोंधळ निर्माण केलाय", असा खोचक टोला राहुल गांधी यांनी लगावला होता.

२३ लाख कोटी गेले कुठे?"मोदी सरकारनं गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या माध्यमातून तब्बल २३ लाख कोटींची कमाई केली आहे. हा पैसा नेमका गेला कुठे?", असा सवाल राहुल गांधी यांनी सरकारला केला होता. देशात डिमोनिटायझेशन आणि मॉनिटायझेशन एकाच वेळी सुरू आहे. मोदींच्या निवडक चार-पाच मित्रांचं मॉनिटायझेशन होत आहे आणि देशातील शेतकरी, कामगार, छोटे दुकानदार, एमएसएमई, नोकरदार वर्ग, सरकारी कर्मचारी आणि इमानदार उद्योगपतींचं डिमॉनिटायझेशन सुरू आहे, असाही टोला राहुल यांनी यावेळी लगावला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा