शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Rahul Gandhi : 'ते सत्तेसाठी काहीही करतील, आम्ही सत्याने लढू आणि जिंकू...' राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 3:29 PM

Rahul Gandhi : ‘RSS-BJP सत्ताग्रही; मोदी-अदानी एकच…सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय.’

Rahul Gandhi : काँग्रेसचे रायपूर अधिवेशन आज संपत आहे. शेवटच्या दिवशी पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले भाषण केले. यावेळी त्यांनी देशातील परिस्थिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गौतम अदानी प्रकरणावर भाष्य केले. जोपर्यंत अदानीचं सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू, असं ते म्हणाले. त्यांनी भाजप-आरएसएसला 'सत्ताग्रही' म्हटले तर आम्ही 'सत्याग्रही' असल्याचे सांगितले. 

राहुल गांधी म्हणाले, 'मी संसदेत एका उद्योगपतीवर हल्ला केला. मी फक्त एकच प्रश्न विचारला, मोदीजी, तुमचा अदानीजींशी काय संबंध? संपूर्ण भाजप सरकारने अदानींना संरक्षण देण्यास सुरुवात केली. अदानीजींवर हल्ला करणारा देशद्रोही आहे...अदानी आणि मोदीजी एकच आहेत. आम्ही एकदा नाही तर हजार वेळा प्रश्न विचारू, जोपर्यंत अदानींचे सत्य समोर येत नाही, तोपर्यंत आम्ही प्रश्न विचारत राहू,' असं राहुल म्हणाले.

'अदानी समुहाविरुद्धच्या तपासाबाबत मी समाधानी नाही. संरक्षण क्षेत्रातील शेल कंपन्यांची चौकशी होत नाहीये. पंतप्रधान त्यावर काहीच बोलले नाहीत, यावरुन पंतप्रधान त्यांना संरक्षण देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.' भारत जोडो यात्रेचा आणि काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्याचा संदर्भ देत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, 'नरेंद्र मोदींनी भाजपच्या 15-20 जणांसह श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावला, तर आम्ही काश्मीरमधील लाखो तरुणांच्या माध्यमातून तिरंगा फडकावला,' असंही राहुल म्हणाले.

ते पुढे म्हणतात, 'एका मंत्र्याने मुलाखतीत सांगितले की, चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा मोठी आहे. मग आपण त्यांच्याशी कसे लढू शकतो? इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले तेव्हा त्यांची अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा लहान होती का? म्हणजेच जे तुमच्यापेक्षा बलवान आहेत त्यांच्याशी भांडू नका. याला भ्याडपणा म्हणतात. आपल्यापेक्षा दुबळ्या व्यक्तीशी लढणे याला भ्याडपणा म्हणतात, हा राष्ट्रवाद नाही', अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस