शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
2
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
3
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
6
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
7
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
8
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
9
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
10
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
11
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
12
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
13
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
14
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
15
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
16
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
17
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
18
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
19
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
20
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय

राहुल गांधी भारत जोडो यात्रा सोडणार होते; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 11:02 AM

काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांचा खुलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचीभारत जोडो यात्रा यशस्वीपणे संपली आहे; परंतु, या यात्रेबद्दल सांगताना काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी खुलासा केला की, सुरुवातीला हे फार सोपे नव्हते, कारण यात्रेच्या तिसऱ्या दिवशी केरळमध्ये यात्रा असताना राहुल गांधींना गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या. वेदना इतकी तीव्र होती की राहुल गांधींनी त्यांच्याशिवाय प्रवास सुरू ठेवण्याचा सल्ला दिला.  

वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधींच्या गुडघेदुखीची माहिती मिळताच प्रियांका गांधी यांचाही फोन आला. इतर ज्येष्ठ नेत्यांकडे प्रचाराची धुरा सोपवण्याचा त्यांनी विचार केला; पण राहुल गांधींशिवाय या प्रवासाची कल्पनाही होऊ शकत नाही. त्यानंतर राहुल गांधींनी शिफारस केलेले फिजिओथेरपिस्ट भेटीला गेले. त्यांनी त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांचा त्रास हळूहळू बरा झाला. केरळमधील पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधताना स्वत: राहुल गांधी यांनी गुडघ्याच्या समस्येबद्दल सांगितले होते. ते म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा त्यांना कठीण जाते तेव्हा ते पक्ष कार्यकर्ते आणि जनतेचा आधार घेतात.

भारत जोडो यात्रेने ७५ जिल्हे, १२ राज्ये आणि दाेन केंद्रशासित प्रदेशांमध्ये १४६ दिवसांत ४,००० किलोमीटरहून अधिक अंतर कापले. यात्रेतील थांबे वगळता राहुल गांधी दररोज पायी चालत होते. यामध्ये तामिळनाडूची कन्याकुमारी ते केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि जम्मू- काश्मीर या राज्यांचा समावेश आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा