शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राहुल गांधी यांनी घेतली आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची भेट

By admin | Published: June 08, 2017 9:02 PM

मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मुत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भेट

ऑनलाइन लोकमत
मंदासोर (मध्य प्रदेश), दि. 8 -  मध्य प्रदेशमध्ये पोलिसांच्या गोळीबारात मुत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भेट घेतली. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आलेल्या राहुल गांधी यांना आज सकाळी अटक करण्यात आले होते.  मात्र त्यांनी जामीन घेण्यास नकार दिला. अखेर पीडितांना भेटण्यास परवानगी देल्यानंतर त्यांनी जामीन घेण्यास तयारी दर्शवली होती. 
पीडित शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, गोळीबारात ठार झालेल्या शेतकऱ्यांना शहीद दर्जा मिळावा, अशी त्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे. आम्ही या मागणीचा पाठपुरावा करू, तसेच पीडितांना संपूर्ण मदत करू." या देशात केवळ 50 श्रीमंतांचेच कर्ज माफ होते, शेतकऱ्यांचे नाही, असे सांगत राहुल यांनी यावेळी मोदी सरकारला टोला लगावला.  
 आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात पाच शेतकरी ठार झाल्यानंतर मध्य प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले होते. त्यातच काल राहुल गांधींनी पीडित शेतकऱ्यांची भेट घेण्याची घोषणा केल्यानंतर तणावात अधिकच भर पडली होती. मात्र राहुल गांधी मध्य प्रदेशमध्ये आल्यावर त्यांना वाटेतच रोखून अटक करण्यात आली होती.  अखेर पीडितांना भेटण्याची परवानगी मिळाल्यावर त्यांनी जामीन घेत मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर पीडितांची भेट घेतली. 
  महाराष्ट्राप्रमाणे पश्चिम मध्यप्रदेशातही शेतकरी 1 जूनपासून आंदोलन करत आहेत. मंगळवारी आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात पाच शेतक-यांचा मृत्यू झाला होता.  या प्रकऱणाची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.