शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

UPA सरकारने अदानींना 72 हजार कोटींचे कर्ज दिले; स्मृती इराणी यांनी थेट फोटोच दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 2:32 PM

बुधवारी लोकसभेत राहुल गांधींनी केंद्रावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर स्मृती इराणी यांनीदेखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

Rahul Gandhi vs Smriti Irani: चार महिन्यांनंतर लोकसभेत परतलेले खा. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मोदी सरकारने मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केल्याचा आरोप राहुल यांनी यावेळी केला. त्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिले. स्मृती म्हणाल्या की, मणिपूर खंडित किंवा विभागला गेला नाही. स्मृती इराणींचे भाषण झाले तोपर्यंत राहुल गांधीसंसदेतून निघून गेले होते, यावरुनही केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना टोमणा लगावला.

लोकसभेत काँग्रेसवर निशाणा साधत स्मृती इराणी म्हणाल्या की, ज्याप्रकारे सभापतींच्या आसनाजवळ आक्रमक वर्तन केले गेले, ते निषेधार्ह आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतमातेची हत्या झाल्याचे बोलले गेले आणि काँग्रेस पक्षाचे नेते यावर टाळ्या वाजवत होते. त्यांच्या आघाडीतील लोक भारताबद्दल चुकीचे भाष्य करतात. काश्मीरवर सार्वमत घेण्याची वक्तव्ये करतात, राहुल गांधींमध्ये हिंमत असेल तर या विधानांचा निषेध करा. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे समर्थन आहे का? या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचा उल्लेख स्मृती इराणी यांनी केला.

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकार गौतम अदानींची बाजू घेत असल्याचा आरोप केला, त्यावर स्मृती इराणी यांनी पलटवार केला. अशोक गेहलोत यांनी राजस्थानमध्ये अदानीसोबत तडजोड का केली, केरळ, महाराष्ट्र किंवा छत्तीसगडच्या सरकारांनी गौतम अदानी यांना काम का दिले, असा सवाल इराणी यांनी यावेळी विचारला. तसेच, यूपीए सरकारच्या काळातही गौतम अदानी यांना कर्ज देण्यात आले होते, यावर राहुल गांधी का बोलत नाहीत, असेही त्या म्हणाल्या.

संबंधित बातमी-  "राहुल गांधी, तुमच्यात जर हिंमत असेल तर..."; स्मृती इराणी यांनी संसदेतच दिलं खुलं आव्हान

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीlok sabhaलोकसभाParliamentसंसदMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशन