शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
5
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
6
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
7
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
8
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
9
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
10
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
11
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
12
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
13
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
14
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
15
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
16
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
17
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
18
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
19
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
20
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका

राहुल गांधी एक वर्ष अध्यक्षपदापासून राहणार दूर ? करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:24 IST

राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना केल्या.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी २५ मे रोजी बोलविण्यात आलेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ केला होता. मात्र पक्षाच्यावतीने राहुल यांचा राजीनामा एकमुखाने नाकारण्यात आला होता. त्यानंतरही राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम राहिले असून त्यांनी नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे.

राहुल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे मनपरिवर्तन करण्यासाठी पक्षाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहे. संकटसमयी राहुल यांनीच काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी विनंती अनेक नेत्यांनी राहुल यांना केली. त्यावर राहुल यांनी पुन्हा एकदा नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना केल्या. तसेच आपण पक्ष संघटनेचे काम करत राहणार असल्याचे म्हटले.

दरम्यान गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांना नवीन अध्यक्ष शोधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानंतर या दोन नेत्यांनी दक्षिण भारतातील नेत्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र कोणताही नेता राहुल असताना अध्यक्ष होण्यास तयार नाही. त्यामुळे हिंदी पट्ट्यातील एखाद्या नेत्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळू शकते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल यांच्या राजीनाम्यावर मधला मार्ग काढण्यात आला आहे. ज्यामुळे राहुल यांचा अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय कायम राहिल आणि पक्षाला नवीन अध्यक्ष मिळेल. न्यूज १८ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार राहुल गांधी पदाशिवाय देशभरातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधून पक्ष संघटन मजबूत करतील. त्यामुळे नवीन अध्यक्ष निवडीसाठी लवकरच काँग्रेस कार्यकारी समितीची बैठक होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.