शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 06:13 IST

आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह बोलत होते.

बोदेली (गुजरात) : वायनाड व रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी खोचक टीका केली. अमेठीत हरल्याने ते वायनाडला गेले. आता तेथे पराभव दिसू लागल्याने त्यांनी रायबरेली गाठली. मात्र, रायबरेलीतही ते मोठ्या फरकाने पराभूत होतील, असे शाह म्हणाले.  

आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना शाह बोलत होते. ते म्हणाले अमेठीतून निवडणूक हरल्यावर ते वायनाडला गेले. आता वायनाडमधून हरणार असल्याचे लक्षात आल्याने ते आता रायबरेलीतून निवडणूक लढवत आहेत. समस्या तुमची आहे, जागेची नाही. तुम्ही रायबरेलीतही मोठ्या फरकाने निवडणूक हराल. तुम्ही पळून गेलात, तरी लोक तुम्हाला हुडकून काढतील, असे अमित शाह म्हणाले.

भाजप सत्तेत असेपर्यंत आरक्षणाला धक्का नाही नरेंद्र मोदींना आणखी एक कार्यकाळ मिळाला, तर ते आरक्षण रद्द करतील, असा खोटा प्रचार राहुल व त्यांचा कंपू करत आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदींना पूर्ण बहुमत मिळाले होते. परंतु, त्यांनी कधीही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला हात लावला नाही. जोपर्यंत भाजप सत्तेत आहे, तोपर्यंत आरक्षणाला कोणीही हात लावू शकणार नाही, असे शाह म्हणाले.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शाह