शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

राहुल गांधींना धक्का, अमेठीतील पेपर मिल येणार 'रत्नागिरी'त

By admin | Published: December 10, 2015 9:41 AM

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील प्रस्तावित पपरमिल आता महाराष्ट्रातील रत्नागिरीत येणार आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १० - केंद्रातून काँग्रेसचे सरकार गेल्याचा परिणाम आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीतील विकास योजनांवरही झाल्याचे स्पष्ट दिसत असून फूडपार्क नंतर आता अमेठीने पेपर मिलही गमावली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या गांधी कुटुंबाला सरकारकडून हा आणखी एक धक्का बसला आहे. अमेठीतील प्रस्तावित ३ हाजर ६५० कोटींची पेपर मिल आता महाराट्रातील रत्नागिरीमध्ये हलवण्यात येणार असून केंद्र सरकारच्या अवजड उद्योग खात्याने यासंदर्भात हालचाल सुरू केली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करेल. 
'आम्ही याप्रकरणी अर्थ मंत्रालय तसेच इतर मंत्रालयांनाही पत्रं लिहीली आहेत, त्या खात्यांच्या सल्ल्यानंतर संबंधित प्रस्ताव आम्ही कॅबिनेटसमोर मांडू', असे अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी सांगितले. 
यापूर्वी ही पेपर मिल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या अमेठीमध्ये सुरू होणार होती, त्यासाठी अमेठीतील जगदीशपूरची निवडही करण्यात आली होती. मात्र ही मिल महाराष्ट्रात लावण्यात यावी अशी मागणी अनंत गीते यांनी केल्यानंतर अखेर हा कारखाना रत्नागिरीत उभा राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कारखान्यामुळे सुमारे ९०० लोकांना रोजगार मिळणार आहे.
पेपर मिलपूर्वी अमेठीतील जगदीशपूरमध्ये फूड पार्कचा प्रस्ताव होता, मात्र अखेर तोही रद्द करण्यात आला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी लोकसभेत हा मुद्दा मांडून मोदी सरकार राजकीय बदला घेत असल्याचा आरोपही केला होता.