शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

आसाममध्ये सत्ता आल्यास नागपूर किंवा पीएमओ सरकार चालवणार - राहुल गांधी

By admin | Published: March 29, 2016 3:04 PM

भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे

ऑनलाइन लोकमत - 
आसाम, दि. २९ - भाजपा निवडणूक जिंकल्यास आसाम सरकारचा कारभार नागपूर, पंतप्रधान कार्यालय येथून चालवला जाईल, आम्हाला आसामचा कारभार आसाममधूनच चालवायचा आहे असं वक्तव्य काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. आसासमध्ये प्रचारसभेदरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही आसाममध्ये कोणत्या धर्माचं, व्यक्तीचं सरकार बनवणार नाही तर प्रत्येकाचं सरकार बनवणार असल्याचं आश्वासन राहुल गांधींनी यावेळी दिलं. 
 
भाजपा सर्व देशावर एकच विचासरणी थोपण्याचा प्रयत्न करत आहे, देश एका विचारसणीवर चालत नाही. मोदी येऊन फक्त वचन देतात आणि निघून जातात. मोदींनी दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने त्यांनी पुर्ण केली. आसामला मिळणारा विशेष दर्जा मोदींना काढून घेतला ज्यामुळे काँग्रेस सरकारच्या राज्यात मिळणारी करोडोंची मदत थांबली असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. 
 
काँग्रेसने गेल्या 15 वर्षात आसाममध्ये शांतता आणली, ही आपली खुप मोठी कामगिरी आहे. हरियाणामध्ये 10 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, कोणतीही दंगल, हिंसा झाली नव्हती. भाजपा सरकार आल्यानंतर हरियाणामध्ये महिन्याभरात हिंसा सुरु होते, जाट आणि इतर लोकांमध्ये भाडणं लावली जात आहेत. भाजपा जिथे जाते तिथे लोकांमध्ये हिंसा भडकवते असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.
 
विजय मल्ल्या, ललित मोदी सहजपणे देशातून पळून गेले, त्यांना परत आणण्याचा काहीच प्रयत्न केला गेला नाही. विजय मल्ल्याची संसदेत एका मंत्र्याशी भेट झाली आणि त्यानंतर तो सहज पळून गेल्याचा आरोप करत राहुल गांधींनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला.