शहरं
Join us  
Trending Stories
1
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
4
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
6
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
7
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
8
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
9
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
10
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
11
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
12
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
13
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
14
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
15
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
16
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
17
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
18
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
19
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
20
नितिन नबीन यांची नड्डांच्या जागी BJP अध्यक्षपदी निवड होताच PM मोदींची पोस्ट, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 14:05 IST

Acharya Pramod Krishnam : काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सध्या देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशातच काँग्रेसचे माजी नेते आणि संभलच्या कल्की धामचे पीठाधीश्वर आचार्य प्रमोद कृष्णम यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. देशावर प्रेम करणारे लोक या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे आहेत. जो पंतप्रधानांसोबत नाही, तो देशद्रोही आहे, असे विधान आचार्य प्रमोद कृष्णम यांनी केले आहे. यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. 

आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, "हे धार्मिक युद्ध आहे. जे रामाचे नाहीत, ते राष्ट्राचे होऊ शकत नाहीत. जर या निवडणुकीत ज्या लोकांचे देशावर प्रेम आहे, ते सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उभे राहतील. जे मोदींच्या पाठीशी उभे राहणार नाहीत, त्यांना देशद्रोही म्हटले जाईल." याचबरोबर, काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावरही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निशाणा साधला आहे. 

सरकार स्थापन झाल्यास राम मंदिराचा निर्णय मागे घेऊ, असे राहुल म्हणाले होते, असे आचार्य प्रमोद यांनी सांगितले. "राम मंदिराचा निर्णय आल्यावर राहुल गांधी यांनी अमेरिकेत राहणाऱ्या एका हितचिंतकाच्या इशाऱ्यावरून म्हणाले होते की, आमचे सरकार स्थापन झाले तर आम्ही महासत्ता आयोग स्थापन करून राम मंदिराबाबतचा निर्णय मागे घेऊ. तेव्हा शाहबानोचा निर्णय रद्द केला जाऊ शकतो, तर राम मंदिराचा निर्णय का नाही?" असा सवालही आचार्य प्रमोद कृष्णम यांनी उपस्थित केला.

दरम्यान, आचार्य प्रमोद कृष्णम यांनी शनिवारी (४ मे) सांगितले की, काँग्रेस लवकरच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या रूपाने दोन भागात विभागली जाईल. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, ते म्हणाले, "काँग्रेस पुन्हा दोन गटात विभागली जाईल, एक राहुल गांधींचा गट आणि दुसरा प्रियंका गांधींचा गट असेल." तसेच, राहुल गांधींवर निशाणा साधताना ते म्हणाले की, मला वाटते राहुल गांधींनी रायबरेलीऐवजी रावळपिंडीतून निवडणूक लढवावी, कारण पाकिस्तानमध्ये त्यांची लोकप्रियता आणि मागणी वाढत आहे.

ज्या पद्धतीने राहुल गांधी अमेठी सोडून गेले, त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खचले आहे, असे आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले. तसेच, ते म्हणाले, "प्रियांका गांधी निवडणूक लढवत नाहीत - हे आता त्यांच्या समर्थकांच्या हृदयात ज्वालामुखीचे रूप धारण करत आहे, जो 4 जूननंतर फुटेल." दरम्यान,  काँग्रेसने अमेठीतून किशोरीलाल शर्मा यांना तिकीट दिले आहे. तर राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी