शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने झाला राहुल गांधींचा पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2019 04:30 IST

गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांंच्याबद्दल स्थानिक मतदारांच्या मनात रोष होता.

अमेठी : गांधी घराण्याचा परंपरागत मतदारसंघ अमेठीच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याने राहुल गांधी यांंच्याबद्दल स्थानिक मतदारांच्या मनात रोष होता. त्यामुळेच अमेठीमध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला, असे दिसत आहे. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा ५५ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला. राहुल येथून २००४पासून सलग तीनदा विजयी झाले. त्याआधी अमेठीतून सोनिया गांधी, राजीव गांधी, संजय गांधी यांनीही निवडणूक लढविली होती.अमेठीतील एक दुकानदार म्हणाला की, माझ्या कुटुंबात फक्त मीच यंदा काँग्रेसला मतदान केले. मात्र अमेठीचा विकास करण्याचे आश्वासन राहुल पूर्ण करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तर मुन्शीगंज भागातील दुकानदाराने सांगितले की, राहुल गांधी यांना धडा शिकविणे आवश्यक होते. त्यांनी मतदारांना गृहीत धरले होते. मात्र या वेळी स्मृती इराणी जिंकणार हे जाणवत होते.विकासासाठी दिले मतएकू दूधविक्रेता म्हणाला की, २०१४ साली मी राहुल गांधी यांनाच मत दिले होते. पण यंदा विकासासाठी काम करणाऱ्यांना मत दिले आहे. स्मृती इराणींनी अमेठीतील काही कारखानेही सुरू केले. त्या इथे सातत्याने येत होत्या. पण राहुल गांधी इथे फिरकलेही नाहीत.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९