शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निलेश राणेंचं ठरलं! धनुष्यबाण हाती घेणार, कुडाळ विधानसभा मतदारसंघातून लढणार
3
निवडणुकीपूर्वी अजित पवारांना 'सुप्रीम' दिलासा; घड्याळ चिन्हाबाबत कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय! 
4
सोन्याची किंमत नव्या शिखरावर, चांदीही लाखाच्या पार; खरेदीपूर्वी पाहा १८ ते२४ कॅरेट सोन्याचे दर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : " सापडलेल्या पाच कोटी प्रकरणी संजय राऊतांची चौकशी व्हावी,", अजितदादांच्या नेत्याने केली मागणी
6
इनोव्हामध्ये ५ कोटींची रोकड सापडली, पण कारमालकाने केला वेगळाच दावा; जबाबदारी झटकत म्हणाला...
7
आचारसंहितेचं उल्लंघन होतंय; मग करा 'सी-व्हिजिल एप'वर तक्रार!
8
ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये भीषण स्फोट, इमारत कोसळली, ९ कर्मचारी गंभीर जखमी 
9
"मी यापुढे कधाही.."; प्रभासला 'जोकर' म्हणाल्यानंतर ट्रोल झालेल्या अर्शद वारसीचं मोठं विधान, म्हणाला-
10
महागाईचा सामना करण्यासाठी सरकारला अंबानींची साथ; Reliance Retailमध्ये मिळणार स्वस्त डाळ, तांदूळ?
11
जळगावमधील उद्धव सेनेचे इच्छुक मुंबईत ठाण मांडून, मविआच्या जागांचा फैसला होईना...
12
...म्हणून पृथ्वी शॉला मुंबईच्या संघातून काढलं; कारण वाचून तुम्हीही डोक्याला लावाल हात
13
माझ्या बापाविषयी बोलाल तर खबरदार, तुमचे काय वाईट केले: जयश्री थोरात यांचा पलटवार
14
मॉडेलिंगचं स्वप्न, १५ वर्षे मोठ्या अधिकाऱ्यासोबत लग्न, घटस्फोटानंतरही राहत होते एकत्र, आता सापडला तरुणीचा मृतदेह  
15
नाशिकमध्ये कुठे नाराजी, कुठे धुसफूस; तर कुठे बंडखोरीची दिसताहेत चिन्हे!
16
"बबिता फोगटला ब्रिजभूषण सिंहांची जागा घ्यायची होती, म्हणून...", साक्षी मलिकचा मोठा दावा
17
१५९ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच HSBC मध्ये महिला CFO ची नियुक्ती; पाहा कोण आहेत पाम कौर?
18
७ ऑक्टोबरच्या हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीने वाढदिवशी उचललं टोकाचं पाऊल, कुटुंबीय म्हणतात...
19
"शब्द दिला असताना तिकीट नाकारलं"; संदीप नाईकांचा भाजपला रामराम, तुतारी हाती घेण्याची शक्यता
20
सर्फराज खानच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन; भारतीय खेळाडू आता 'बापमाणूस'!

राहुल गांधींचा नवा लूक सद्दाम हुसैनसारखा वाटतो? गडकरींनी दिलं नेहरुंचं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 3:00 PM

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती

नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपच्या या यशानंतर काँग्रेसच्या मानहानीकारण पराभवाचीची चर्चा रंगली आहे. त्यासोबतच, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेलाही जोडलं जात आहे. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानमध्ये असून यात्रेतील घडामोडींची आणि राहुल गांधींच्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी या लूकवरुन आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधी हे सद्दाम हुसेनसारखे दिसायला लागलेत, असे विधान केले होते. यालाच धरुन केंद्रीयमंत्री नितीन गडकरींना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, त्यांनी मी माझ्या कामाकडे लक्ष देतो, असे म्हटले.  

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींच्या दाढीची तुलना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनशी केली होती. मात्र, टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी एवढेच म्हणालो की जर तुम्हाला सद्दामसोबत बसवले तर तुम्हालाही तसेच वाटेल. पण तुम्ही दाढी काढलीत तर तुम्ही नेहरूंसारखे दिसाल, मात्र, त्यांच्या या तुलनात्मक विधानाची चर्चा सोशल मीडियासह माध्यमांतही दिसून आली. त्यावरुनच, आता आज तकच्या एका कार्यक्रमात नितीन गडकरींना हाच प्रश्न विचारण्यात आला. आपल्याच मुख्यमंत्र्यांनी अशी तुलना केली होती, आपणास काय वाटतं? त्यावर गडकरींनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. 

मी या वादविवादात पडू इच्छित नाही, मला वाटतं की ते विरोधी पक्षात आहेत. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सत्तारुढ पक्षाची जेवढी गरज आहे, तेवढीच विरोधी पक्षाच्या मजबुतीचीही आवश्यकता आहे. मी कालच युट्यूबवर अटलबिहारी वाजपेयी याचं भाषण ऐकत होतो. त्यामध्ये, अटलबिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरुंची तुलना जगातील दोन अशा नेत्यांसोबत केली होती, त्यावरुन संसदेत गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, हा वाद झाल्यानंतरही रात्री जेव्हा नेहरुजी मला भेटले, तेव्हा त्यांनी माझ्या भाषणाचं कौतुक केलं. म्हणजे, टीका करणे हा विरोधी पक्षांचा अधिकार असतो, राहुल गांधी हे सध्या विरोधी पक्षात आहेत, त्यांचा पक्ष विपक्ष आहे. त्यामुळे, विरोधी पक्ष म्हणून त्यांनी चांगलं काम करायला हवं, असे उत्तर नितीन गडकरी यांनी दिले. तसेच, प्रत्येकाला मेहनत करण्याचा अधिकार आहे, जेवढी ताकद आहे, तेवढी पणाला लावू द्यात. प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे, जो सरस ठरेल तो पुढे जाईल, असेही भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना गडकरींनी म्हटले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा