शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

वायनाड वासीयांनो अमेठीत येऊन पाहा आणि सावध व्हा; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 11:00 IST

भाजपाच्या अमेठी मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराला जोर धरला आहे. यंदाच्या या निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून अनेक कल्पना लढविण्यास सुरुवात होत आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाल्याने त्यांच्यातील कलगीतुरा चांगलाच रंगात येऊ लागला आहे. 

उत्तर प्रदेशातील पारंपरिक असलेला अमेठी आणि केरळातील वायनाड या दोन मतदार संघातून राहुल गांधी आपले नशीब आजमावणार आहेत. आज वायनाड मतदार संघातून राहुल गांधी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावरुन भाजपाच्या अमेठी मतदारसंघातील उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. 

लखनऊ विमानतळावर दाखल झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी पत्रकाराकांशी बोलताना राहुल गांधी यांना लक्ष केले. त्या म्हणाला, "गेल्या 15 वर्षांपासून अमेठीचे खासदार अशी एक व्यक्ती आहे, ती याठिकाणी येत नाही. आता ते दुसऱ्या ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. हा अमेठीतील लोकांचा अपमान आहे. तसेच, त्यांनी देशाला का लुटले याचे उत्तर दिले पाहिजे. वायनाडमधील लोकांनी एकदा तरी अमेठीत येऊन पाहिले पाहिजे आणि सावध झाले पाहिजे. यासाठी मी त्यांना आवाहन करते."  

दरम्यान, राहुल गांधी यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अमेठी या त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून लढविली होती. मात्र, त्यांच्याविरोधात असलेल्या भाजपाच्या स्मृती इराणी यांनी त्यांना चांगलीच टक्कर दिली होती. स्मृती इराणी यांनी त्यावेळी 23 दिवसांचा प्रचार करत 3 लाख मते मिळवली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही अमेठी मतदारसंघातून जोरदार टक्कर देणाऱ्या स्मृती ईराणींनी पुन्हा राहुल गांधींना आव्हान दिले आहे. 

(राहुल गांधींचे मिशन साऊथ; वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार, प्रियंकासोबत भव्य रोड शो )

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSmriti Iraniस्मृती इराणीamethi-pcअमेठीwayanad-pcवायनाडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक