शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

मोदी सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; राहुल, प्रियंका, सोनिया गांधींनी केला 'ट्रिपल अॅटॅक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2020 16:03 IST

काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 

ठळक मुद्देकाँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात केली आहे.सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देश फाळणीनंतरच्या सर्वात मोठ्या अरिष्टातून जात आहे.सरकारने तत्काळ आपला खजिना खुला करून गरिबांना मदत करायला हवी - सोनिया गांधी

नवी दिल्ली : लॉकडाउच्या मुद्यावर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर ट्रिपल अॅटॅक केला.

काँग्रेसच्या या तीनही वरिष्ठ नेत्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात सोशल मीडियावर पक्षाच्या स्पीक अप इंडिया अभियानाला सुरुवात करत मोदी सरकारवर जबरदस्त हल्ला चढवला. सोनिया गांधी म्हणाल्या, कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे गरिबांचे हाल होत आहेत. मात्र, सरकार त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. 

सरकार समजून घ्यायलाच तयार नाही -सोनिया गांधी म्हणाल्या, ‘देश फाळणीनंतरच्या सर्वात मोठ्या अरिष्टातून जात आहे. गरीब, मजूर, छोटे व्यापारी आणि शेतकरी चिंतित आहेत. देशातील प्रत्येक व्यक्ती त्यांना होणारा त्रास अनुभवत आहे. मात्र, सरकारवर याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही. आम्ही सरकारला वारंवार सूचना केल्या मात्र, सरकार समून घ्यायला तयार नाही. त्यामुळे आता काँग्रेसने भारताचा आवाज उंचावण्याचा विडा उचलला आहे. सरकारने तत्काळ आपला खजिना खुला करून गरिबांना मदत करायला हवी.’

40 किलो स्फोटकं, संरक्षणदलावर निशाणा; आयजींनी सांगितला पुलवामामध्ये असा होता दहशतवाद्यांचा 'प्लॅन'

Video : पुलवामामध्ये जवानांनी 'अशी' उडवली दहशतवाद्यांची IEDने भरलेली कार, 3 दिवसांपूर्वीच मिळाले होते 'इनपुट'

सरकारने गरिबांच्या बँक खात्यात पुढील 6 महिने 7,500 रुपये टाकायला हवेत. मनरेगाअंतर्गत वर्षाला 100 दिवसांऐवजी 200 दिवस काम द्यायला हवे. एमएसएमई क्षेत्रासाठी तत्काळ निधीची घोषणा करण्यात यावी. तसेच सरकारने मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचीही व्यवस्था करावी, असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.

गरिबांचे नुकसान - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, "मजुरांना भुकेल्यापोटी हजारो किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. देशाला मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारे उद्योग धंदे एका पाठोपाठ एक बंद होत आहेत. भारताला कर्जाची आवश्यकता नाही. आज देशाला पैशांची आवश्यकता आहे. गरीब जनतेला पैशांची आवश्यकता आहे. यामुळे काँग्रेस सरकारसमोर चार मागण्या ठेवत आहे."

युद्धाच्या मैदानात चीनला घाम फोडेल स्वदेशी 'तेजस', या 'इस्रायली' क्षेपणास्त्रांनी आहे सज्ज

महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न -काँग्रेस सरचिटनीस प्रियंका गांधी म्हणाल्या, "गरिबांच्या खात्यात तत्काळ 10 हजार रुपये टाकले गेले पाहीजे. मी विषेश करून भाजपाला सांगते, की राजकारण करू नका. ही वेळ सर्वांनी मिळून गरिबांना साथ देण्याची आहे. विचारधारा बाजूला ठेवण्याची आहे. उत्तर प्रदेश सरकारने बसेसवरून राजकारण केले. महाराष्ट्रात सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आज देशातील जनता त्रस्त आहे. सरकार त्यांना मदत करत नाहीये. आम्ही मानवतेच्या आधारावर ही मागणी करत आहोत. आपण सर्वांनीच या दुःखाच्या प्रसंगात त्यांची साथ द्यायला हवी.’

POK : पाकिस्तानने चीनच्या सोबतीने उचलले मोठे पाऊल; भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता

 

टॅग्स :congressकाँग्रेसNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्या