शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

अंबानी-अदानींवर एका बाजूला सडकून टीका अन् राजस्थानात काँग्रेस सरकारनंच अदानींना दिली १६०० हेक्टर जमीन; चर्चांना उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 17:38 IST

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

जयपूर-

देश तीन-चार बड्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असल्याचं राहुल गांधी यांचं हे विधान आपण अनेकदा ऐकलं आहे. जयपूरमध्ये आयोजित महागाई विरोधातील रॅलीत देखील राहुल गांधी यांनी न चुकता हे वाक्य घेतलं होतं आणि मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. जयपूरमध्ये १२ डिसेंबर रोजी आयोजित काँग्रेसच्या रॅलीमध्ये राहुल गांधी यांनी अदानी आणि अंबानी यांना फायदा मिळावा म्हणून केंद्र सरकार काम करत असल्याचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधला होता. "एअरपोर्ट, कोळसा खाण, सुपर मार्केट जिथं पाहावं तिथं नुसतं केवळ दोनच लोक दिसत आहेत. अदानीजी आणि अंबानीजी", असं राहुल गांधी म्हणाले होते. राहुल गांधी यांच्या याच विधानावरुन आता राजस्थानात राजकारणाला सुरुवात झाली आहे. 

राजस्थानातील काँग्रेस सरकारनं सोलर पार्कसाठी राज्यातील १६०० हेक्टर जमीन नुकतीच अदानी ग्रूपला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे, याच मुद्द्याला धरून आता राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे.

राजस्थानात १५०० मेगावॅट उर्जा निर्मितीसाठीचं सोलर पार्क बनवण्यासाठी अदानी आणि राजस्थान सरकारच्या संयुक्त विद्यमानं स्थापन करण्यात आलेल्या अदानी रिन्यूएबल एनर्जी पार्क कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. याअंतर्गत जसलमैरच्या भीमसर, माधोपुरा, सदरासर गावात १३२४.१४ हेक्टर, बाटयाडू आणि नेडाण गावात २७६.८६ हेक्टर सरकारी जमीन अदानी ग्रूपला देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. याशिवाय ३० मेगावॅट विंड सोलर हायब्रिड पावर प्रोजेक्टसाठी अदानी ग्रूपला जसलमैरच्या केरालियाँ गावात ६४.३८ हेक्टर सरकारी जमीन भाडेतत्वावर देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. 

अदानी ग्रूपला देण्यात आलेल्या जमीनीवरुनच आता राजस्थानात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सोशल मीडियातही सरकारच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसंच राहुल गांधी यांची अदानी, अंबानींविरोधातील विधानं पण प्रत्यक्षात राजस्थान सरकारनं केलेला करार याचं उदाहरण देऊन अनेक मिम्स सोशल मीडियात व्हायरल होताना दिसत आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे सरकारनं सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुनच अदानी ग्रूपला जमीनीचं वाटप केल्याचा दावा सरकारनं केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAdaniअदानीcongressकाँग्रेसRajasthanराजस्थान