शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मच्छीमारांच्या प्रश्नावरून राहुल यांची मोदींवर टीका

By admin | Published: May 27, 2015 11:52 PM

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.

वक्कड (केरळ) : मच्छीमारांपासून ‘सागर माते’ला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशी घोषणा करीत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी मासेमारीवरील बंदीला मुदतवाढ देण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर जोरदार हल्ला चढविला.‘जमीन ही शेतकऱ्यांची माता आहे, तर सागर ही तुमची माता आणि तुमची माता हिसकावून ती दुसऱ्या कुणाच्या तरी ताब्यात देण्याचा त्यांचा (मोदी सरकार) प्रयत्न आहे’, असे राहुल गांधी म्हणाले. केरळच्या चावक्कड येथे आयोजित मच्छीमारांच्या संमेलनात ते बोलत होते.मासेमारीवरील ४५ दिवसांची बंदीची मुदत वाढवून ६१ दिवस करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि मीनाकुमारी अहवालातील काही तरतुदींच्या विरोधात केरळमधील मासेमारी करणाऱ्यांनी आंदोलन छेडलेले आहे. संसदेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरून मोदी सरकारविरुद्ध हल्लाबोल करणारे राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, कोळी आणि आदिवासी हे राष्ट्राचा आत्मा आहेत आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. रालोआ सरकार परीब कोळी, शेतकरी आणि आदिवासींसोबत लढत नसून देशाच्या आत्म्याशी लढत आहेत. (वृत्तसंस्था)सागरही हिसकावून घेण्याचा प्रयत्नमोदी सरकार ज्याप्रमाणे शेतकऱ्यांची मौल्यवान जमीन हिसकावून घेत आहे, त्याचप्रमाणे मच्छीमारांचा सागरही हिसकावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भारतात जमिनीला सोन्याची किंमत आली आहे. त्यांना हे सोने शेतकऱ्यांना नव्हे तर आपल्या मित्रांना द्यावयाचे आहे. तसेच हा सागरही मच्छीमारांना नव्हे तर मित्रांना द्यावयाचा आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.