शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

राहुल यांची मोदी, ममतांवर टीका

By admin | Published: April 03, 2016 3:52 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता

नियामतपूर (पश्चिम बंगाल) : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यासुद्धा आपल्या राज्यात त्यांचाच कित्ता गिरवीत असल्याचा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला.डाव्या आघाडीच्या नेत्यांसोबत आयोजित एका संयुक्त सभेत ते बोलत होते. मोदी यांच्यावर लक्ष्य साधताना ते म्हणाले, पंतप्रधान या देशातील लोकशाही चिरडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी अरुणाचल प्रदेश आणि उत्तराखंडमधील काँग्रेसची सरकारे मनमानीपणे पदच्युत केली. देशात केवळ एकच नेता असावा आणि तो ते स्वत: असावेत अशी मोदींची इच्छा आहे. एवढेच नाहीतर येथील जनतेवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी थोपविण्याची मोहीमच राबविली जात आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरही त्यांनी कडाडून टीका केली. मी संसदेत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना भेटतो तेव्हा त्या (ममता बॅनर्जी) जे सांगतात तेच होते. इतर कुणाचे काहीही ऐकून घेतले जात नाही, असे या नेत्यांचे म्हणणे असते. हीच परिस्थिती भारतीय जनता पार्टीत सुद्धा आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला. (वृत्तसंस्था)अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी, जखमींना भेटले कोलकाता : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी कोलकात्यातील अपघातग्रस्त उड्डाणपुलाची पाहणी केली. पीडितांचे सांत्वन करण्यासाठी मी येथे आलो असून, या मुद्यावर राजकारणाची आपली अजिबात इच्छा नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. गुरुवारी झालेल्या या उड्डाणपूल अपघातातील मृतांची संख्या २६ झाली आहे.राहुल गांधी यांनी कोलकाता मेडिकल कॉलेज आणि इस्पितळात जाऊन अपघातातील जखमींचीही विचारपूस केली. उड्डाणपुलाच्या बांधकामातील त्रुटींकडे लक्ष वेधले असता मी येथे जखमींच्या भेटीसाठी आलो असून, राजकारणावर बोलणार नाही, असे काँग्रेस उपाध्यक्षांनी स्पष्ट केले. भाजपने साधले शरसंधानउड्डाण पूल दुर्घटनेनंतर राजधानी दिल्लीत व प. बंगालमधे आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाने जोर पकडला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी शनिवारी घटनास्थळी गेले. भाजपने मात्र या घटनेवर थेट शरसंधान करीत म्हंटले की छायाचित्राव्दारे स्वत:ची प्रसिध्दी घडवण्याची आणखी एक संधी राहुल गांधींनी साधली.