शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
2
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
3
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
4
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
5
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
6
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
7
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
8
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
9
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
10
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
11
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
12
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
13
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
14
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
15
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
16
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
17
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
18
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
19
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
20
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा

Railway Kavach Technique: 160 च्या स्पीडने दोन ट्रेन समोरासमोर आल्या! इंजिनमध्येच होते रेल्वे मंत्री, 'कवच' चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2022 3:57 PM

Railway Kavach anti collide test: रेल्वेसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा होता. परदेशात या तंत्रज्ञानासाठी प्रती किमीला २ कोटी रुपये खर्च येतो. रेल्वेने ते ५० लाखांत विकसित केले आहे.

भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस खूप ऐतिहासिक होता. रेल्वेने कवच तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची आज चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी ठरली आहे. यासाठी १६० किमी प्रती तासाच्या वेगाने दोन ट्रेन एकमेकांच्या दिशेने येत होत्या. एका ट्रेनच्या इंजिनामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव होते. या ट्रेन एकमेकांपासून अवघ्या ३८० मीटरवर येऊन थांबल्या आणि सर्वांना हायसे वाटले. 

रेल्वे मंत्र्यांनी याचे व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. सनतनगर-शंकरपल्ली विभागामध्ये ही चाचणी घेण्यात आली. 

कवच' हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो. 

जेव्हा ट्रेन अशा सिग्नलवरून जाते, जिथे तिला जाण्याची परवानगी नसते, तेव्हा त्यातून धोक्याचा सिग्नल पाठविला जातो. जर लोको पायलट ट्रेन थांबवण्यात अयशस्वी ठरला, तर 'कवच' तंत्रज्ञानाद्वारे ट्रेनचे ब्रेक आपोआप लागू होतात आणि ट्रेन कोणत्याही अपघातापासून वाचते. अधिकाऱ्याने सांगितले की, हे तंत्रज्ञान हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. यासोबतच, ते SIL-4 (सिस्टम इंटिग्रिटी लेव्हल-4) शी सुसंगत आहे, जे सुरक्षा तंत्राचा सर्वोच्च स्तर आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यंदाच्या बजेटमध्ये या कवच यंत्रणेची घोषणा करण्यात आली होती. 

 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAshwini Vaishnawअश्विनी वैष्णव